Thursday, July 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हट्टातलं प्रेम की, प्रेमातला हट्ट?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2020
in लेख
Reading Time: 1 min read
हट्टातलं प्रेम की, प्रेमातला हट्ट?

प्रेमाला अदृश्य सीमा असतात. हट्टाला नाही. प्रेम द्यायला शिकवते तर हट्ट घ्यायला. प्रेम डोळे उघडते तर हट्टाने ते मिटतात. प्रेम माणसांना जोडते तर हट्ट ते तोडण्याचे काम करते. प्रेमात आपुलकी आणि आनंद आहे तर हट्टात अहंकार आणि असूया.

साधारणपणे लोकं गल्लत करतात हट्ट आणि प्रेम या दोन परस्पर विरोधी भावना मध्ये. माणसाचं मन हे एक समुद्रासारखं आहे. ज्या वेळी ह्या भावनांची मोठी लाट येते, ते जोरजोरात उसळू लागतं, नाहीतर एकतर शांत होतं. आपल्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती किंवा परिस्थिती नुसार या लाटा कमी जास्त अंतराने नेहमीच उसळत असतात.

जर कोणत्या भावनेने हे उसळले तर शांत करायला लागते ते प्रेम याउलट ज्याचा उद्रेक व्हायला लागतो तो हट्ट. लोक बरोबर या उलट याला समजतात. आपलं मन खरतर एक स्क्रीन आहे ज्यावर दररोज वेगवेगळे प्रसंग दिसतात. ती नेहमी बदलत असते आणि खर तर बदलली पाहिजे कारण सगळे दिवस सारखेच नसतात. आज जे आहे ते उद्या नसेल कदाचित, किंवा आज जे नाही उद्या मिळेल, यात काहीच स्थिर नाही, स्थिर आहे ते मन आणि ते स्थिर ठेवण्याचे काम करते ते प्रेम.

लहानपणी एखादी वस्तू आवडली की आपल्याला ती हवी असायची मग त्यासाठी काही वाट्टेल ते करायचं, पण एखादी वस्तू अवडल्यावर तिची किंमत करून आपण ती आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला देतो, तो ही ती सांभाळून ठेवतो, हाच फरक आहे प्रेम आणि हट्टातला.
बरं आणखी एक उदाहरण, दुपारी मी झाडांना पाणी देता देता थोडं पक्षांना पण शेजारी ठेवते, त्यांनी ते प्यावं ही माझी इच्छा असते, ते माझ्या नकळत येतात आणि पाणी पिऊन उडून जातात.

दुसऱ्या दिवशी स्वतः हुन येतात, हाच फरक आहे प्रेमात त्यांची काळजी आहे म्हणून त्यांना मी पिंजऱ्यात बांधून ठेऊ शकत नाही किंवा पुन्हां पुन्हा येण्यासाठी बांधून ठेऊ शकत नाही त्या आपसूक येतात आणि सकाळसकाळी चिवचिवाट करतात.

प्रत्येकाने च प्रेमात असलं पाहिजे पण त्यात असलेला आनंद हा कोणत्यांही वस्तू किंवा माणसात नसावा, आपण इतरांना आवडू लागतो, कोणीतरी आपल्याला आवडू लागते खर तर हे ती व्यक्ती नसतेच त्यांचा स्वभाव असतो, मग जर तो स्वभाव बदलला तर काल आवडणारी व्यक्ती अचानक आवडेनाशी होते, जर ते प्रेम एक गोष्टीपर्यंत सीमित ठेवलं तर ती गोष्ट नाहीशी झाली की दुःख होत पण त्याला जर कोणत्या वस्तू किंवा व्यक्ती च्या ही पुढे नेलं तर आपोआप ही भावना जागृत होते, ज्या प्रमाणे घर समुद्र किनारी असेल तर लाटा येऊन ते उध्वस्त करणारच पण तेच घर जर एखाद्या स्थिर ठिकाणी असेल तर कितीही लाटा आल्या तरी आपलं घर स्थिर राहील, इथे आपलं घर म्हणजे मन आहे, ज्याचा आनंद हा कोणत्याही भौतिक सुखात नाही तरीही त्याला ते सगळं आनंदाने उपभोगता येते, कारण त्यात ही ते रमते.

ज्याप्रमाणे लहानपणापासून आई- वडिलांचे प्रेम मिळाले तरी आपण कधी तरी त्यापासून दूर जातो त्यात अडकत नाही तसाच जर प्रेमात राहायचं तर सार्वभौमिक राहावं, चुकलं तर वाट दाखवत ते प्रेम, खुपल तर काळजी करत ते प्रेम, आणि वाट वेगळी असली तरी त्यावर चालण्याचं बळ देतं ते प्रेम, जग राहाटी शिकवत ते प्रेम.

पण याउलट जे हवंय ते हट्टातलं प्रेम की, प्रेमातला हट्ट? परिस्थितीत, कोणत्याही थराला जाऊन मिळवणे हा हट्ट. प्रेमाला अदृश्य सीमा असतात. हट्टाला नाही. प्रेम द्यायला शिकवते तर हट्ट घ्यायला. प्रेम डोळे उघडते तर हट्टाने ते मिटतात. प्रेम माणसांना जोडते तर हट्ट ते तोडण्याचे काम करते. प्रेमात आपुलकी आणि आनंद आहे तर हट्टात अहंकार आणि असूया. त्यामुळं जर कोणाला जिंकायचं असेल तर प्रेम करा, अगदी स्वतः ला सुद्धा, कारण प्रेम अनंत आहे.

संकलन-अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण
( एम.ए.अर्थशास्त्र,पीएच.डी.(ap) )
एल.एल.बी.,पीजी.डी.आय.पी.आर*
सी.सी.डी.सी.अपार्मेंट पहिला मजला प्लाँट नं.०२ समर्थ काँलनी,हाँटेल पांचाली जवळ,प्रभात चौक,जळगाव
arunchavan2510@gmail.com

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मेहरूण वॉर्ड क्र. १५ मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधारणा अंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन

Next Post

शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द-किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन

Next Post
शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द-किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन

शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द-किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications