Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नामावर श्रद्धा असली पाहिजे-दादा महाराज जोशी यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

“केशवस्मृती” व डॉ. आचार्य कुटुंबीयांतर्फे आयोजित भागवत सप्ताहात

जळगाव – (प्रतिनिधी) – भगवंताच्या नामस्मरणावर श्रद्धा असली पाहिजे, नामस्मरणावर श्रद्धा असली म्हणजे कोणतेही कार्य विनाअडथळा सहज पार पाडता येते असा उपदेश ह.भ.प. दादा महाराज जोशी यांनी आज शनिवारी येथे आयोजित भागवत कथा सप्ताहात दुसऱ्या दिवशी केला.
स्व.डॉ. अविनाशजी (दादा) आचार्य यांच्या स्मृतीनिमित्त २८ फेबु्वारी ते ५ मार्च दरम्यान दुपारी २.३० ते ६ यावेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड, जळगाव येथे प्रख्यात प्रवचनकार आणि जळगावातील चिमुकल्या राम मंदिरातील कथाकार श्री.दादा महाराज जोशी यांच्या मुखातून भागवत कथा सप्ताहास प्रारंभ झाला असून त्यात ते भागवत कथेचे निरुपण करीत आहे.

दादा महाराज म्हणाले की, जिवन जगत असतांना विचारवंताच्या जवळ गेलेच पाहिजे, विचारवंताला विचारल्याशिवाय आपले विचार वाढत नाहीत व प्रगती देखील होत नाही. वैराग्य, प्रेम, ज्ञान, भक्ति यांची विविध उदाहरणे आपल्या उद्बोधनात दिली. भक्ती चे ३ प्रकार असून ईश्वर प्राप्ती साठी केली जाणारी भक्ति, प्रापंचिक भक्ति, निस्सीम भक्ति. प्रापंचिक भक्ति ईश्वरापर्यंत पोहचत नाही. कारण त्यामध्ये तणाव असतो असतो व तणाव माणसाला जेव्हा येतो तेव्हा त्यामध्ये अहंकार दडलेला असतो. भागवत हा माणसाचा अहंकार घालवतो व प्रत्येक वेळी भागवताचा अर्थ नव्याने उलगडत जातो.

सत्य हे ब्रम्ह आहे. ब्रम्ह पाहणे म्हणजे खरा व्यवहार करणे हा आहे. ब्रम्ह फक्त पुजा अर्चा करून होत नाही तर तो आचरणात आणावा लागतो ज्ञानाचा उपयोग शस्त्राने न करता सुगंधाने करावा. ज्ञानाचा वापर सत्कार्याने केल्यास ज्ञान वाढत जाते व देण्याची प्रवृत्ती वाढत जाते.
सत्कर्म म्हणजे नुसते पुजापाठ नव्हे तर चांगले कार्य करत राहणे देखील सत्कर्मच आहे. भागवतात सतकर्मालाच महत्व आहे. सामाजिक काम करणे हे देखील सतकर्मच असून सामाजिक काम करणारा व्यक्ती नारादासारखा नम्र असला पाहिजे. नम्रता हि नारदासारखी असावी बोलण्यातील, चालण्यातील, व्यक्तिपरत्वे शिष्टाचार हे सर्व नारदांचे गुण आहेत म्हणून संताच्या या मांदियाळीत नारद सामाजिक संत म्हणून प्रचलित आहेत.

महर्षी व्यासांनी ग्रंथ लिहितांना कलियुगात कोणते विचार असतील हे ओळखुनच ग्रंथ लिहले आहेत. प्रत्येक व्यक्तीची पहिली गुरु हि त्याची आईच आहे. गणपतीची पहिली गुरु देखील त्याची आईच होती. श्रीमन नारायण नारायण हरि हरि या भजनाचा ही जयघोष झाला. भक्ती,युक्ती आणि शक्ती यांचा समन्वय साधता आला पाहिजे असा विचारही त्यांनी मांडला.

केशवस्मृती सेवासंस्था समूहातील आश्रय माझे घर, मातोशी आनंदाश्रम, सेवावास्ती विभागाच्या संचालकांच्या सामूहिक आरतीने सांगता झाली. रविवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ठिक २.३० वाजता निरुपणाला प्रारंभ होईल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण

Next Post

रोटरी जळगाव ईस्ट तर्फे नारी रत्न पुरस्कार प्रदान

Next Post
रोटरी जळगाव ईस्ट तर्फे नारी रत्न पुरस्कार प्रदान

रोटरी जळगाव ईस्ट तर्फे नारी रत्न पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d