Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने नियमितपणे सुरू ठेवावी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशभरात 23 मार्चपासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाला आहे. जनतेला या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. त्याचअनुषंगाने केंद्र शासनाने विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र शासनाच्या 24 मार्च, 2020 च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये किराणा दुकाने तसेच औषधी दुकाने लॉकडाऊनच्या काळात कार्यरत राहतील असे नमूद केले आहे.
जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या तरतूदीनुसार अन्नधान्य व औषधे यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आलेला आहे. असे असतांनाही काही किराणा दुकाने व औषधांची दुकाने लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याचे व त्यामुळे सध्या चालू असलेल्या अशा दुकानांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे त्याठिकाणी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा करता यावा यासाठी सर्व किराणा व औषध दुकानदारांनी आपली दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत‍ सुरू ठेवावीत. तसेच आवश्यकतेनुसार सदरची दुकाने 24 तास चालू ठेवण्याचे आदेश जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 (2) च्या तरतूदीनुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करण्यांवर कारवाई करण्याचे अधिकार किराणा दुकानांच्या बाबतीत पुरवठा विभागाचे निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीस तर औषधी दुकानांच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीस यांना राहतील. असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहसचिव चारूशीला तांबेकर यांनी एका परिपत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरीकांचे सर्वेक्षण पूर्ण;२४५५ पथके कार्यरत

Next Post

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या दोघांविरूध्द पाचोऱ्यात गुन्हा दाखल

Next Post

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या दोघांविरूध्द पाचोऱ्यात गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo