Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माहिती अधिकार कायद्यात बदल की कायद्याचा खून – अमोल कोल्हे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2019
in माहितीचा अधिकार २००५, लेख
Reading Time: 1 min read
कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ -माहितीचा अधिकार

भारताच्या इतिहासात माहिती अधिकार कायदा सन 2005 साली लागू झाला, त्या नंतर या कायद्यात अनेक सुधारणाही झाल्या . कोणताही कायदा  अस्तित्त्वात येतो तेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी त्यातील त्रुटी, कमतरता लक्षात घेणे, व जनमत पाहणे आवश्यक असते. त्यानंतरच मग मूळ कायद्यात बदल केला जातो, आणि मग पारित केला जातो.

माहितीचा अधिकार कायद्यातआता जी सुधारणा करण्यात आली ,त्यानुसार माहिती आयुक्त यांचे वेतन,त्यांचा कार्यकाळ हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत करण्यात आला आहे. अर्थात माहिती आयुक्तांवर केंद्रशासनाची निगराणी राहील हे स्पष्ट आहे.यामुळे ज्या उद्देशाने माहितीचा अधिकार कायद्याची निर्मिती झाली आहे, तो उद्देश बाजूला पडून शासनाचा हस्तक्षेप वाढणार आहे. निवडणूक आयुक्त आणि माहिती आयुक्त यामध्ये फरक आहे, मुख्य निवडणूक आयुक्त हे घटनेने तयार केलेलं पद तर माहिती आयुक्त हे कायद्याने तयार केलेलं पद आहे,आणि ते तसेच राहणे गरजेचे आहे. सरकारला अडचणीत आणत असणारी एखादी माहिती जर माहिती आयुक्तांनी सरकारला मागितली तर सरकार माहिती देण्याऐवजी माहिती आयुक्तांचा कार्यकाळ संपुष्टात आणेल, आणि जर असे झाले तर याचिककर्त्याला माहिती मिळण्यास उशीर होईल.जो अधिकारी सरकारचे ऐकत नाही तो सेवामुक्त होतो हा इतिहास आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अशाच दबावाला झुगारून  वाढीव कार्यकाळ न घेता राजीनामा  देणे पसंत केले.  उर्जित पटेल यांनीही केंद्राचा रिझर्व्ह बँकेत केंद्राचा हस्तक्षेप वाढू लागल्याने राजीनामा देऊन टाकला. ही बोलकी उदाहरणे  आहेत. माहिती आयुक्तांच्या अधिकारात बदल केल्यास सरकारच्या मर्जीत असणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून  हवा तसा कारभार करून सरकार माहिती अधिकार कायद्याची मरणासन्न अवस्था करतील हे दिसून येत आहे.अश्या कायद्यात बदल करणे म्हणजे जनतेची व लोकशाही ची फसवणूक करणे आहे, कायदे जरी सभागृहात मंजूर होत असले तरी जनमत घेणं आवश्यक आहे. शंभर उद्योगपतींचे कर्ज सरकारने कसे माफ केले ? याबाबत माहिती विचारली गेली, यासाठी याचिककर्त्याकडून माहिती अधिकार लावण्यात आला म्हणून या अधिकारात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव लोकसभेत व राज्य सभेत मांडण्यात आला व तो सत्तेच्या जोरावर मंजूर करून घेण्यात आला. शासनाला प्रश्न विचारायचे नाही, आणि विचारले तरी आम्ही उत्तर देण्यास बांधील नाही असा चुकीचा संदेश यामुळे जनतेत जात आहे.सरकारची तिजोरी ही जनतेची आहे,जनतेचा पैसा कसा खर्च झाला याचा हिशेब जनतेला विचारण्याचा अधिकार आहे, परंतु सरकार माहिती अधिकार मवाळ करत आहे.माहिती अधिकार कायदा 2005 साली महत्त प्रयत्नाने संमत झाला, भाजप सरकारने हा कायदा मवाळ करण्याचं विधेयक संसदेत मंजूर केले. माहिती अधिकाराने भल्या भल्याचे धाबे दणाणले आहे.सरकार आणि प्रशासनचा कारभार पारदर्शक असावा ,म्हणून महिती अधिकाराचे रक्षण होणे गरजेचे आहे,मात्र हे हत्यार बोथट झाले तर लोकशाही धोक्यात येईल. यामुळे या अधिकाराची धार कायम ठेवण्यासाठी लढा दिला पाहिजे.

श्री.अमोल अशोक कोल्हे mob- 9021839265

जिल्हा अध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ , जळगाव

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महानगरपालिकेने निराश्रित बेघर लोकांच्या निधीत कमावलं?

Next Post

युवकाने मागीतली ईच्छामरणाची परवानगी

Next Post

युवकाने मागीतली ईच्छामरणाची परवानगी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications