Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गरीब आणि गरजूंसाठी आहार… ‘शिवभोजन’ योजना ठरली तारणहार निर्बंध काळात 95 हजार लाभार्थ्यांनी घेतला शिवभोजन थाळीचा मोफत लाभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
गरीब आणि गरजूंसाठी आहार… ‘शिवभोजन’ योजना ठरली तारणहार निर्बंध काळात 95 हजार लाभार्थ्यांनी घेतला शिवभोजन थाळीचा मोफत लाभ


आतापावेतो 12 लाख 95 हजार 450 लाभार्थ्यांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ


जळगाव, (जिमाका) दि. 5 – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 एप्रिलपासुन विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये. याकरीता राज्य शासनाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यातील गरजूंना चांगलाच फायदा झाला असून निर्बंध काळात जिल्ह्यात 94 हजार 857 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.

राज्यातील गरीब आणि गरजूंसाठी शिवभोजन थाळी योजना राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 1 जानेवारी, 2020 रोजी घेतला. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात, जळगाव शहरात ही योजना सर्वप्रथम राबविण्यात आली. 26 जानेवारी, 2020 रोजी या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुरूवातीस जिल्ह्यासाठी 700 थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देणेत आले होते. त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच 1400 थाळी इतका करण्यात आला. तर शासनाच्या 26 मार्च, 2020 च्या परिपत्रकानुसार तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक 3 हजार 500 थाळींपर्यंत वाढविण्यात आला. शासनाने टप्प्याटप्प्याने उद्दिष्टाबरोबरच क्षेत्राचा देखील विस्तार करून ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित केली.

जळगांव जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 38 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात 16 व ग्रामीण भागात 22 केंद्र आहेत. शहरी भागात 16 केंद्रामधून 1 हजार 250 थाळ्या तसेच ग्रामीण भागात 22 केंद्रामधून 2 हजार 175 थाळ्या वितरीत करण्यात येतात. शिवभोजन ॲपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो व लाभार्थ्याचे पुर्ण नांव याची नोंद घेण्यात येते. लाभार्थ्यांना वरण, भात, एक भाजी आणि दोन चपाती एका थाळीमध्ये देण्यात येत आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 एप्रिल, 2021 पासुन विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने एक महिना कालावधीसाठी शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दिडपटीने वाढवून दिला असून त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 38 शिवभोजन केंद्रांना इष्टांक दिडपटीने वाढवून दिल्याने याचा लाभ जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना दररोज होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज 5 हजार 125 थाळ्यांचे वितरण सुरू आहे.

शिवभोजन केंद्रात मिळणारी थाळी यापुर्वी दहा रूपयांना मिळत होती. जास्तीत जास्त गरीब व गरजूंना लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी मागील लॅाकडाऊन कालावधीपासुन शासनाने एका थाळीसाठी केवळ पाच रुपये किंमत ठेवली होती. आता विशेष निर्बंध कालावधीमुळे एक महिना ही थाळी पुर्णपणे मोफत देण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील हजारो गरीब आणि गरजू दररोज घेत असून निर्बंध कालावधीत जिल्ह्यात या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ 94 हजार 857 लाभार्थ्यांनी घेतला आहे. तर राज्यात शिवभोजन थाळी योजना कार्यान्वित झाल्यापासुन आजपावेतो 12 लाख 95 हजार 450 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना पार्सल स्वरूपात जेवण देण्यात येत आहे. केंद्राचे आवारात सोशल डिस्टन्सिंगचे कसोशीने पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा. लाभार्थींची संख्या वाढल्यास रांगा करून दोन ग्राहकात आवश्यक अंतर (किमान 6 फूट) ठेवावे. त्यानुसार जमिनीवर मार्किंग करणे, केंद्र चालक आणि केंद्रांमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी आणि लाभार्थ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून तशा सूचना जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्बध काळात जिल्ह्यातील गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना आहार पुरविणारी शिवभोजन थाळी योजना तारणहार ठरली असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुर्यवंशी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

अंनिसच्या मिनाक्षी चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

Next Post
अंनिसच्या मिनाक्षी चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

अंनिसच्या मिनाक्षी चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d