Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवभोजन योजनेचा लाभ गरीब व गरजूंनी आवश्य घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ  10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करून देण्याची महत्वाची योजना प्रत्येक जिल्ह्याच्या  मुख्यालयाचे ठिकाणी  26 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात शिवभोजन योजना सर्वप्रथम जळगाव शहरात आज दि. 26 जानेवारी पासून कार्यान्वित करण्यात आली. शहरातील जिल्हा रुग्णालय, साई मल्टी सर्विसेस, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारातील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने चालवलेले कैलास कोल्ड्रिंक्स, येथील शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.

 याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार  सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी,  उपस्थित होते.

           शिवभोजन केंद्रे शहरातील वर्दळीचे 8 ठिकाणे केले असून त्यासाठी  8 भोजनालयांची निवड करण्यात आली आहे. जळगाव शहरासाठी 700 थाळीचे उद्दिष्टे शासनाने ठरवून दिले आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या शिवभोजनासाठी भोजनालय चालकांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजनात  प्रत्येकी 30 ग्रॅम दोन चपात्या, 100 ग्राम एक वाटी भाजी, 150 ग्राम  भात व 100 ग्रॅमची एक वाटी वरण समाविष्ट  आहे. शिवभोजन थाळी दहा रुपयात  देण्यात येत असून  ही संबंधित भोजनालयात  दुपारी 12 ते 2 या वेळेत मिळेल. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागांमध्ये प्रतिथाळी 50 रुपये  एवढी असली तरी ग्राहकाकडून मात्र फक्त दहा रुपये एवढेच शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित रक्कम अनुदानस्वरूप शासनाकडून थेट संबंधित भोजनालय चालकांना वितरित करण्यात येईल.

          शिवभोजनाचा आस्वाद घेणाऱ्या  गरीब आणि गरजू जनतेची दररोज नोंद घेण्यासाठी शासनाने शिवभोजन मोबाईल ॲप विकसित केला असून भोजनालय चालक या ॲपद्वारे थाळी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव नोंदवून फोटो अपलोड करतील. मोबाईल क्रमांक असल्यास त्याची देखील नोंद ॲपमध्ये घेण्याची सोय आहे. याद्वारे शासनास रोज किती थाळींचा खप झाला याची माहिती लगेच उपलब्ध होणार आहे.  जिल्ह्यातील गरीब आणि गरजू जनतेने शिवभोजन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायमंत्री सुनिल केदार जिल्हा दौऱ्यावर

Next Post

प्रतिलिपी यंत्रे टंकलेखन/प्रतिलिपी यंत्रज्ञ प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला उपलब्ध

Next Post

प्रतिलिपी यंत्रे टंकलेखन/प्रतिलिपी यंत्रज्ञ प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला उपलब्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo