Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विकास प्रशासनात प्रसारमाध्यमांचे महत्व अनन्यसाधारण : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
विकास प्रशासनात प्रसारमाध्यमांचे महत्व अनन्यसाधारण : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

परिविक्षाधीन आयएएस तुकडीला माध्यमांची हाताळणी या विषयावर केले मार्गदर्शन

नाशिक, दि. 27 मार्च 2021 (विमाका वृत्तसेवा):विकास प्रशासनात प्रसारमाध्यमांचे महत्व अनन्यसाधारण आहे, त्यांच्यासोबत आदराने वागा; त्यांच्या मदतीनेच विकासात्मक योजना जनतेपर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

दुरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात २०१७, २०१८ आणि २०१९ या तुकड्यांच्या परिविक्षाधीन आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुंबई येथून अपर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक, पुणे येथून यशदाचे महासंचालक चोक्कलिंगम, उपमहासंचालक नयना गुंडे, अतिरिक्त संचालक प्रकाश पोटे आणि परिविक्षाधीन आयएएस अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना विभागीय आयुक्त श्री.गमे म्हणाले, केंद्र शासन आणि राज्य शासनाने काही मार्गदर्शक तत्वे आपल्याला आखून दिले आहे. शासकीय निर्णय असो किंवा सोशल मीडिया हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात चौकट आखून दिलेली आहे. या चौकटी मध्ये राहून अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत संबंध ठेवले पाहिजे.

विकासात्मक प्रशासनात प्रसारमाध्यमांसोबत आपले संबंध वृद्धिंगत कसे होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी जाणीव जागृती बैठक ही संकल्पना राबविणे आवश्यक असते. फक्त पत्रकार परिषदांपुरते प्रसारमध्यमांसोबत संबंध न ठेवता लोककल्याणासाठीच्या योजनांबाबत मत घेणे देखील आवश्यक आहे. प्रसमाध्यमांमध्ये गैरसमजातून एखादी सकारात्मक बातमी नकारात्मक होऊ नये यासाठी माध्यमकर्मींच्या संपर्कात राहणे आवश्यक असल्याचेही यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी वर्गाने चर्चासत्रात भाग घेत शंका विचारल्या आणि विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी शंकांचे निरसन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंशतः लाॅकडाऊन च्या काळात नागरीकांनी घ्यावयाची काळजी, करावयाचे सहकार्य याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे जिल्हावासियांना आवाहन

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

Next Post
महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo