Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अपर मुख्य सचिवांनी घेतला ‘प्रत्येक शेताला पाणी’ योजनेचा आढावा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

धुळे(जिमाका वृत्तसेवा)- रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात ‘हर खेत मे पानी’ (प्रत्येक शेताला पाणी) आणि त्यामध्ये मग्रारोहयोची उपयोगिता याबाबत आढावा घेत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., उपवनसंरक्षक एम. एम. भोसले, नाशिक येथील प्रादेशिक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, मंत्रालयातील रोहयो विभागाचे सहाय्यक संचालक विजयकुमार कलवले, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो) आदी उपस्थित होते.श्री. नंदकुमार यांनी सांगितले, की प्रत्येक पिकासाठी पाण्याची नव्हे, तर ओलाव्याची आवश्यकता असते. शास्त्रोक्त पद्धतीने पाणी उपलब्ध झाल्यास पिकांचे उत्पादन वाढते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांशी अधिकाधिक संवाद साधण्याची आवश्यकता आहे. जलसंधारण व मृदसंधारणाच्या कामांतून कृषी विकास करता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने कामकाज करावे. याबरोबरच रोजगार हमी योजनेतून विविध कामे घेण्यात येतात. त्याचेही नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान समजून घेत ‘रोहयो’विषयी सकारात्मक दृष्टिकोना ठेवावा. तसेच आगामी काळात या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., श्री. भोसले, अधीक्षक अभियंता श्री. काळे, सहाय्यक संचालक श्री. कलवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी ‘रोहयो’च्या अंमलबजावणीबाबत ऑनलाइन मार्गदर्शन केले.

उपजिल्हाधिकारी श्री. दाणेज यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. तडवी (ग्रामपंचायत) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वांद्रे-कुर्ला संकुल पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

Next Post

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d