Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेवा सुरु करण्यास मनाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

       उस्मानाबाद, दि. 6 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 17 मे, 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये ग्रीन झोन मध्ये बसमधील बैठक व्यवस्थेच्या 50 टक्के इतक्या क्षमतेने बस सुरु करणेस परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच बसेसद्वारे फक्त ग्रीन झोनमध्येच प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
        कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणे, वैदयकीय निकषानुसार निश्चित केलेले सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.
       सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असून उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमांलगत असलेले जिल्हे हे रेड व ऑरेज झोनमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरु केल्यास या बसेस फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातच प्रवाशांची वाहतूक करु शकतील.
     तसेच बसेस सुरु केल्यामुळे जिल्हयातील बस स्थानकांवर फार मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सद्यस्थितीत दि. 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊनचे कालावधीत उस्मानाबाद जिल्हांतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची वाहतुक सुरु करणे आवश्यक नसल्याची खात्री झाली आहे.
      त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त अधिकारांनुसार कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्हांतर्गत राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु करण्यास मनाई केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात आली आहे.
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात 17 मे पर्यंत 144 कलम लागू

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश

Next Post
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo