Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव दि. 15 प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समाजाशी समरस करणारा आहे. गांधीजींच्या अहिंसक समाजाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी प्रथम समाजाशी समरस होण्याची आवश्यकता गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी प्रतिपादित केली.

एक वर्ष चालणाऱ्या अभ्यासक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधन विभागाच्या डीन डॉ. गीता धर्मपाल, शिक्षणतज्ज्ञ अमोद कारखानीस, समन्वयक उदय महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. अश्विन झाला होते. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले कि, मानवी जीवनात हृदय (Heart), डोकं (Head) व हात (Hand) अर्थात भावना, विचार व काम या तीन गोष्टींवर यशस्विता अवलंबून असते. गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समूह जीवनाद्वारे शिकण्याची प्रेरणा देते. व्याख्याने, क्षेत्र भेट, सर्वेक्षण, इंटर्नशिप याद्वारे विचार प्रक्रियेला चालना दिली जाते. विचार प्रक्रियाच समाजात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा देत असतांना गांधी विचारच जगात शांती प्रस्थापित करतील व ते गांधी विचार पोहोचविण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महात्मा गांधीं संदर्भातील अनेक गैरसमज दूर होण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी, ग्राम स्वराजची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी हा अभ्यासक्रम लाभदायक ठरल्याची भावना व्यक्त केली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांमध्ये रक्तापलीकडचे नाते तयार झाले. आपल्या घरापासून कधीही दूर न राहिलेल्या या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाल्याचेही ते म्हणाले. गत २० वर्षात केवळ परीक्षा पास होण्यासाठी शिकलो मात्र गांधी रिसर्च फाऊंडेशनने एक वर्षात केवळ जीवनाला दिशा न देता त्यासंदर्भातील तयारी आमच्याकडून करून घेतल्याचे सांगितले. शाश्वत शेती (सस्टेनेबल फार्मिंग), ग्रामोद्योग या विषयांवर अधिक भर देण्याची आवश्यकताही त्यांनी सांगितली. दुर्गा, चेतन, सौरभ, प्रतीक, देवेश, प्रशांत, अदिती, वैभव, प्रांजली, अमित, मयुरी, आरती, शरद, प्रफुल्ल, निलेश, बंटी या यवतमाळ, भंडारा, नाशिक, लातूर आदी जिल्ह्यांसह गुजरात मधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. गीता धर्मपाल, अमोद कारखानीस व डॉ. अश्विन झाला यांनीही मनोगत व्यक्त केले. गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील, निर्मला झाला आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिजाऊ ब्रिगेडच्या वसुंधरा लांडगे, रत्नाताई भदाणेंचे प्रयत्न;अमळनेर तालुक्यात विधवा विरोधी प्रथेला प्रतिसाद

Next Post

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

Next Post
शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची - अतुल जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo