Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करतांना उत्खननात आढळले दोन ‘कलश’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करतांना उत्खननात आढळले दोन ‘कलश’

चाळीसगाव प्रतिनिधी( किशोर शेवरे)-शहरातील डॉ आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात पुतळ्याखाली दोन कलश सापडले असून या दोनही कलश मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी असल्याचे यावेळी समाज बांधवानी सांगितलं आहे.याचे वृत्त पसरताच अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, स पो नि विशाल टकले, निसार सैय्यद, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, तलाठी यांनी भेट देऊन माहिती घेतली.

चाळीसगाव शहरात नगरसेविका सौ.सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून त्याठिकाणी काम सुरू आहे. आज दि 22 जुलै रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास 10 फूट खाली काँक्रीट मध्ये दोन अस्थी कलश आढळून आले. या कलश मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी असल्याचे समाजातील जाणत्यांनी सांगितलं. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल, माजी आमदार साहेबराव घोडे, नगरसेवक रामचंद्र जाधव, बबलू जाधव, गौतम जाधव आदी समाज बांधव त्याठिकाणी येऊन या अस्थी कलश ची विधीवत पूजन करून अस्थीकलश बाहेर काढले. एका अस्थी कलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव व दुसऱ्या कलशावर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख असल्याची माहिती मिळत आहे.

यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितले की त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक भगवान बागुल यांनी एका पेपरचे कात्रण दाखवून माहिती दिली होती की 6 डिसेंबर 1956 रोजी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले 9 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले व 10 डिसेंबर रोजी क्रांतीसुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जमलेल्या हजारो लोकांनी तेव्हा मुंडन केले होते त्यात चाळीसगाव येथील शामाजी जाधव, सीताराम चव्हाण व चाळीसगाव येथील भिम अनुयायी यांनी हे अस्थीकलश चाळीसगावी आणले व 1958 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला त्यावेळी अस्थीकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते ते आज उत्खनन करताना मिळून आले आहे.

विधिवत पूजन करून कलश पुन्हा पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवण्यात आले – तहसीलदार अमोल मोरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम नगरपालिका चाळीसगावच्या वतीने सुरु असतांना उत्खननात दोन कलश आढळून आले यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी असल्याचे समाज बांधवांकडून समजले. कलश न उघडत विधिवत पूजा करून पुन्हा पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी मिडियाशी बोलतांना दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ॲड. अभिजीत रंधे यांचे महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन च्या वतीने २३ रोजी साखळी उपोषण

Next Post

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

Next Post
हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d