Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव” २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणार यंदाचे पाचवे वर्ष

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव” २१ ते  २८ सप्टेंबर दरम्यान होणार यंदाचे पाचवे वर्ष

जळगांव(प्रतिनिधी)- परिवर्तन जळगावतर्फे साहित्य अभिवाचन महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. “वाचन संस्कृती समृद्ध करू या” ब्रीदवर आधारित असलेला साहित्य अभिवाचन महोत्सव आठ दिवस चालणार आहे. दि. २१ ते २८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात उत्तमोत्तम पुस्तकांच अभिवाचन सादर होणार आहे. या संदर्भात परिवर्तनाच्या सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. जळगाव शहरात वाचन संस्कृती रुजावी, बहरावी या उद्देशाने ‘परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव’  २०१५ मधे सुरु करण्यात आला आहे. महोत्सवाच यंदाच हे पाचवे वर्ष आहे असून विनोद पाटील व मनोज पाटील यांची महोत्सव प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.   पदमश्री भालचन्द्र नेमाड़े , ना धो महानोर , अशोक भाऊं जैन , विजय बाविस्कर , अनिल पाटकर , मोहन थत्ते या मार्गदर्शन समितीचे मार्गदर्शन या महोत्सवाला लाभल आहे. परिवर्तन ही साहित्य, नाट्य, चित्र, संगीत असा विविध क्षेत्रात गेल्या काही वर्षा पासून कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. वाचन संस्कृती समृद्ध व्हावी यासाठी परिवर्तनने साहित्य अभिवाचनाचे एकेका दिवसाचे अनेक कार्यक्रम घेतले, या कार्यक्रमामधूनच आठ दिवसांचा साहित्य अभिवाचन महोत्सवाची निर्मिती झालीय.  वाचकांना वाचनासाठी प्रवृत्त करावे, चांगल्या पुस्तकांची आवड युवा वर्गात निर्माण व्हावी, अशा विविधांगाने हा साहित्य अभिवाचन महोत्सव आकाराला आला आहे. मोबाईल व वाट्सपच्या या काळात पुस्तकांशी नातं जोडायला लावणा-या सात दिवसांच्या अभिवाचन महोत्सवात शब्दांना संगीत, प्रकाश, नेपथ्य व दिग्दर्शकीय भूमिकांतून पहायला व अनुभवायला मिळणार आहे. यंदाचे महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून अशा आठ दिवसीय अभिवाचन महोत्सव आयोजित करून कार्यक्रमांची निर्मिती करणारे जळगाव हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे.वाचन संस्कृती लोप पावते आहे, मराठी भाषा संकटात आहे , अशी भीति सगळे व्यक्त करत असतात या पार्श्वभूमीवर, उत्तोमउत्तम साहित्याचा परिचय रसिकांना व्हावा, श्रेष्ठ साहित्यिकाची ओळख व्हावी, वाचन संस्कृती समृध्ध व्हावी यासाठी परिवर्तनने आपल्या नाट्याच्या माध्यमातून, अभिवाचनाच्या माध्यमामधून हा वाचन संस्कृतिचा महोत्सव सुरु केला आहे .मागच्या तीन वर्षापासून या महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे .अभिवाचन संस्कृतीच्या माध्यामातुन वाङ्मयीन चळवळ जोर धरते आहे .परिवर्तनने नाटक व साहित्य यांचा उत्तम मिलाफ करत या नव्या अभिवाचन संस्कृतीची रुजवात जळगाव मध्ये केली आहे. परिवर्तनने सुरेश भट, महात्मा गांधी, अतुल पेठे, श्रीनिवास नार्वेकर, विजय तेंडुलकर, अमृता प्रितम, साहिर व इमरोज, भारत सासणे, यासारख्या जेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतीच्या साहित्याचा समावेश केला असून. मोठयांसोबत लहानग्या मुलांचे अभिवाचन सादर होणार आहे.कथा, कांदबरी , कविता , लेख , आमचरित्र , नाटक , असे विविध साहित्य प्रकारांच् नाट्य वाचन परिवर्तन कलावंतानी केलेल आहे. अनुभवी रंगकर्मी सोबतच नव्या नव्या कलावंतांना पण या अभिवाचन महोत्सवामधून रंगमंचावर येण्याची संधी परिवर्तनने उपलब्ध करुन दिली आहे .या अभिवाचन महोत्सवाला मां. आ राजू मामा भोले , सिविल इंजीनियर असोसिएशन , आर्यन पार्क यांचे प्रायोजकत्व लाभले आहे . 
हा महोत्सव जळगाव शहरातील रसिकांसाठी खुला असून दररोज सायं ७ ते ८या वेळात रोटरी भवन मायादेवी नगर , येथे होणार आहे .कार्यक्रमास उपस्थितिचे आवाहन परिवर्तनचे अध्यक्ष शंभु पाटील यांनी केले आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कक, अमित माळी होरिलसिंग राजपूत , वसंत गायकवाड, मंजुषा भिडे, सुदिप्ता सरकार,शिरीष बर्वे ,  किशोर पवार, मिलिंद काळे , अनंत जोशी, मंगेश कुलकर्णी, मोना तडवी, प्रवीण पाटील ,  राहुल निम्बालकर, संदीप केदार, सोनाली पाटील, अंजली पाटील , विजय जैन, राजू बाविस्कर, नितीन सोनवणे,  अक्षय नेहे, डॉ रेखा महाजन, नीलिमा जैन , अशोक कोतवाल, रविंद्र डहाके , विकास मलारा, हर्षदा कोल्हटकर  उदय सपकाळे, अभिजित पाटील बिना मलारा , सुनीता दप्तरी , प्रतीक्षा कल्पराज , मिलिंद जंगम ,सुचिता पाटिल , अनिता नेमाने आदी यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आखतवाडे येथे दिव्यांगांना शासकीय निधी व साहित्य वाटप

Next Post

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास उपविजेतेपद

Next Post
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास उपविजेतेपद

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास उपविजेतेपद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d