Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलिसांनी संयमाने कर्तव्य बजावणे गरजेचे; ठाण्यात पत्रकाराला तर वसईत नर्सला मारहाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई-(जालिंदर आमले) -(ठाणे) : आवाहन करून सुद्धा रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी खाकीचा दाखवण्यास सुरूवात केली. मात्र कारवाई करताना पोलिसांनीही जरा भान ठेवलं पाहिजे. ठाण्यात पोलिसांनी थेट पत्रकार, नर्स यांनाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या या वागणुकीमुळे सध्या सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनावश्यक रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलिस त्यांच्या काठीने मारहाण करत आहे. ठाणे ग्रामीण येथे एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचे रिपोर्टर उत्कर्ष चतुर्वेदी हे वार्तांकन करत असताना, पोलिसांनी त्यांना हटकले. ते वारंवार पोलिसांना आपण पत्रकार असल्याचे सांगत असतानाही पोलिसांनी त्यांच एक न एकता. सरळ त्यांच्यावर काठी उगारली. पोलिसांच्या मारहाणीत उत्कर्ष गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कळाल्यानंतर पत्रकारांनी हा मुद्दा उचलून धरत, गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचे माहिती सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर पोलिसांच्या या कारवाईवर अनेक तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पत्रकाराला पोलिसांनी केलेली जबर मारहाण

मात्र पोलिसांची ही काही पहिली वेळ नाही. वसईत प्रियांका राठोड या नर्स असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. त्या कामावर जात असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या हल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका मागोमाग एक अशा घटना पुढे येऊ लागल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. सरकारकडून या पूर्वीच पालिका, आरोग्य सेवा, पत्रकार, डाॅक्टर, नर्स अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना संचारबंदीच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. मात्र तरी ही पोलिसांकडून खात्री न करताच बळाचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एरंडोल तालुक्यातील जि.प.शिक्षकांचा उस्फुर्त उपक्रम ; एक दिवसाचा पगार कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचा निश्चय

Next Post

नांद्रा येथे सँनेटाईजर व फिनाईल ची फवारणी

Next Post

नांद्रा येथे सँनेटाईजर व फिनाईल ची फवारणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo