Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य स्वच्छता कार्यात अग्रेसर राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य स्वच्छता कार्यात अग्रेसर राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 20 : देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत मिशन राबविण्यात आघाडीवर आहे. स्वच्छता राखण्यासाठी जनजागृतीमध्ये भविष्यातही राज्य असेच आघाडीवर रहावे यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी. स्वच्छ भारत मिशन राबविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

स्वच्छ भारत मिशन टप्पा–दोन (ग्रामीण) अंतर्गत ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ या उपक्रमाचा प्रारंभ “मित्रा” या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रशिक्षण संस्थेत करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुरदृश्यप्रणालीद्वारे केले. या कार्यक्रमास प्रशिक्षकाशी संवाद साधताना मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव अभय महाजन यांच्यासह राज्यातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्य यापूर्वीही स्वच्छता मिशन राबविण्यात यशस्वी राहिला आहे. यापुढेही अशीच कामगिरी आपणाकडून होईल अशी आशा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ हा नारा दिला आणि संत गाडगे महाराज यांनी ग्रामीण भागात ‘स्वच्छतेची चळवळ’ उभी केली होती. या दोन्ही महान व्यक्तींचा आपण आदर्श ठेऊन काम करणे गरजेचे आहे. राज्याला आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 तसेच ओडीएफ (हागणदारी मुक्त) च्या माध्यमातून गावांमध्ये स्वच्छ मोहीम उभी करावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने घनकचरा, मैल गाळ व्यवस्थापन, प्लास्टीक व्यवस्थापन आणि गोबरधन इत्यादी महत्त्वाचे प्रकल्प आपण राज्यभर राबविणार आहोत. यासाठी आपण ‘मित्रा’ सारख्या देशपातळीवर नावाजलेल्या सर्व सुविधांनी सुसज्ज अशा संस्थेत आपले प्रशिक्षण पूर्ण करावे, असे सांगून मंत्री श्री. पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 चे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

Next Post

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा ;भाऊंचे उद्यानासमोर 500 किलो केळी वाटप

Next Post
जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा ;भाऊंचे उद्यानासमोर 500 किलो केळी वाटप

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा ;भाऊंचे उद्यानासमोर 500 किलो केळी वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo