Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बिळात?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(चेतन निंबोळकर)- जळगांव शहरात लोकप्रतिनीधीं कडून सामान्य जनतेचा वारंवार होणारा अपेक्षाभंग हा कायम चिंतेचा विषय राहिला आहे. आपली लोकशाही व्यवस्था जगात किती उत्तम आहे, अशा बाता नेहमी मारल्या जातात, पण प्रत्यक्षात ही व्यवस्था खरेच सक्षमपणे काम करते का, या प्रश्नाचे उत्तर अनेकदा “नाही” असेच येते. अशातच महामारीसारखे कोरोनाचे संकट जगावर, भारतावर आणि जळगाव वर थैमान घालत आहे. अशा वेळी जळगांव शहराचे लोकप्रतिनीधी नगरसेवक, आमदार, खासदार मात्र गायब झाल्याचे चित्र शहरवासीयांना दिसून येत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत शहरातील विविध सामाजिक संस्था गरिब गरजूंना तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधवांना शक्य तेवढी मदत करताना दिसून येत आहे तर एकीकडे सामान्य नागरिकांचे हक्काचे लोकप्रतीनिधी मात्र चक्क रफूचक्कर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील जे सामान्य नागरिकांची हातमजूरीवर चूल पेटते अशा नागरिकांची आता एक एक दिवस घरातील सर्व डबे झटकून सांज निभवताना दिसत आहे. ही भयानक अवस्था कधी युद्ध काळातही आली नाही. म्हणून काही समाजसेवक आणि संस्था या दुःखाला मलम म्हणून काहीतरी वाटप करून गरीबांच्या घशात घालतांना दिसून येत आहेत. परंतू जळगांव शहरातील जनसामान्यांचे हक्काचे लोकप्रतिनीधी जे आजपर्यंत एखाद्या कामाच्या ठेक्या साठी एकमेकांची कॉलर धरतात, प्रत्येक समारंभाला देणगी देतात, ते मात्र गायब आहेत. यामागे काय रहस्य आहे? कदाचित लोकप्रतिनीधी म्हणत असतील, नागरिकांचा आणि आमचा संबंध निवडणूक पुरताच. आणि तो व्यवहार आम्ही मताचे पाचशे रुपये देऊन रोखीने केला आहे. म्हणून जळगांव शहरातील लोकप्रतिनीधी बिळात घुसून बसले असावेत का? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांत उपस्थित होत आहे. का या कोरोना ऐवजी भुकेने माणसं मेल्यावर लोकप्रतिनीधी फक्त सांत्वन करायला येतील का? अशी देखील चर्चा जनमाणसांत रंगली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कजगांव येथे डाँ भुषण मगर यांनी केली नागरीकांची मोफत तपासणी

Next Post

आश्रय फाऊंडेशनने घेतली फैजपूर शहरातील सुमारे ६० लोकांच्या रोजच्या जेवणाची जबाबदारी

Next Post

आश्रय फाऊंडेशनने घेतली फैजपूर शहरातील सुमारे ६० लोकांच्या रोजच्या जेवणाची जबाबदारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo