दिनांक:८ मे २०२०, नवीमुंबई प्रतिनिधी
देशात कोरोना विषाणू प्रादुर्भाव हा झपाट्याने होत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या हि वाढत चालली आहे. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून राज्यात व देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. पण तरीसुद्धा रुग्णसंख्या आटोक्यात येण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहेत.
येणाऱ्या काही काळात रुग्णसंख्या अजून वाढू शकते असा प्राथमिक अंदाज प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री. प्रवीण खेडकर यांनी वर्तवला आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या हॉल, राखीव भूखंडावर बांधण्यात आलेल्या वस्तू तसेच उत्तराखंड भवन, ओडिसा भवन, उत्तरप्रदेश भवन, केरळ भवन, राजस्थान भवन, आगरी-कोळी भवन यासारख्या इतर सर्व इमारती ताब्यात घेऊन त्या जागेमध्ये विलगीकरण कशी निर्माण करण्यात यावा अशी विनंती प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष प्रवीणजी खेडकर यांनी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्तांना केली आहे.