यूजीसीच्या परीक्षे बाबतच्या मार्गदर्शन सुचनेमधे कुठेही नमूद नाही आहे कि अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजे याउलट यूजीसीने संपूर्ण स्वायत्तता विद्यापीठांना दिलेली आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर का कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळता येत नसेल तर मार्गदर्शक सूचनेतील परिच्छेद क्रमांक.5 प्रमाणे विद्यार्थ्यांना सरासरी गुण प्रदान करण्यात यावे. मग श्री.उदय सामंत यांनी हे पत्र यूजीसीला कशासाठी पाठविले याची कल्पना करता येत नाही. शिक्षण हे राज्याच्या अखत्यारीत येते मग राज्याने यावर स्वतः निर्णय घेतला पाहिजे असे मासु ने म्हटले आहे.