Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊन काळात २३,९२५ व्यक्तींना अटक, ६ कोटी ७८ लाखांचा दंड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
१० लाख ७८ हजार १२१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. ९ : राज्यात  लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ८ जूनपर्यंत  कलम १८८ अंतर्गत १,२४,१०३ गुन्ह्यांमध्ये २३,९२५ व्यक्तींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ८१ हजार १९१ रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Maha Info Corona Website

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन ८४,५१७ वाहने जप्त करण्यात आले. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६३ घटना घडल्या. त्यात ८४६ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलीस विभागाच्या हेल्पलाइन क्रमांक १०० वर,या काळात १,००,९५८ दूरध्वनी आले. त्या सर्वांची दखल घेण्यात येऊन संबंधितांना दिलासा देण्यात आला.

आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ६६९ पासेस पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ९१ हजार४९६ व्यक्तींना कॉरंटाईन करण्यात आले आहे.

ज्यांच्या हातावर कॉरंटाईन असा शिक्का असलेल्या ७२२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९१,४९६ व्यक्ती कॉरंटाईन करण्यात आले आहे.

पोलीस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील २० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २१, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याकरिता नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २०२ पोलीस अधिकारी व १२८६ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कॅम्प

राज्यात सध्या एकूण २८६ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास १३,१८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांना कर्ज उभारणीसाठी शासन हमी

Next Post

राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्ण बरे होऊन गेले घरी

Next Post
बरे झालेल्यांची संख्या विक्रमी; एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले

राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्ण बरे होऊन गेले घरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications