Monday, August 25, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यात कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ९९ हजार पास वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ९९ हजार पास वाटप

६ लाख १९ हजार व्यक्ती क्वारंटाईन; ८ कोटी ३२  लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि.२१ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ९९ हजार २८० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख १९ हजार व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Maha Info Corona Website

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २० जून या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,३३,३११ गुन्हे नोंद झाले असून २७,२६६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ३२ लाख २३  हजार ७११ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७५ घटना घडल्या. त्यात ८५४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर वर १ लाख ३ हजार  फोन

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.       लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,०३,९९६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७३४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,१९,८१८  व्यक्ती Quarantine  आहेत, अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८३,४९७ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १,

पालघर १ अशा ४७ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या ११८ पोलीस अधिकारी व ८८३ पोलिस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कॅम्प

राज्यात सध्या एकूण १०९ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३,५४८

लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट ; गावकऱ्यांना दिला दिलासा

Next Post

क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

Next Post

क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कुऱ्हाड ते कळमसरा रस्तावर बिबट्यांचा भरला पोळा! परिसरात भितीचे वातावरण; वनविभाग सुन्न!!!

कुऱ्हाड ते कळमसरा रस्तावर बिबट्यांचा भरला पोळा! परिसरात भितीचे वातावरण; वनविभाग सुन्न!!!

सेवापुस्तक माहिती अधिकारात मागवता येते का? Can the service book be requested through the Right to Information?

सेवापुस्तक माहिती अधिकारात मागवता येते का? Can the service book be requested through the Right to Information?

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात संपन्न

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात संपन्न

विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

जलतारा योजनेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कासमपुरा ग्रामपंचायतीचा गौरव

जलतारा योजनेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कासमपुरा ग्रामपंचायतीचा गौरव

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications