Friday, August 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनोशी पुन्हा दोन हात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे;कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांत निर्बंध आदेश जारी

जळगाव (जिमाका) दि. २० – कोरोना प्रादुर्भाव होवू नये यासाठी तयार केलेल्या नियमांचे नागरीक पालन करीत नसल्याने जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मे, जून महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तशीच परिस्थिती आता जिल्ह्यात होवू द्यायची नसेल, पुन्हा लाॅकडाउन नको असेल तर सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोनोशी दोन हात करायचे आहे. ही लढाई पून्हा जिंकायची आहे, त्यासाठी सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी. असे भावनात्मक आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

संशयितांचा शोध सुरू
संशयित रूग्णांचा शोध घेण्यासाठी

ते म्हणाले की, जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 780 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हीटीचा रेट १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. धोका वाढलेला आहे. गतवर्षी जशी एप्रिल, मे, जूनमध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढली होती तशी आता वाढत आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता जिल्ह्यातील बंद केलेली सर्व कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सूरू करण्यात येत आहे. सर्व ठिकाणी ऑक्सीजन, औषधांचा साठा वाढविण्यात येत आहे.
आपण सर्व्हेक्षण मोहीम सुरू केली आहे. सोबतच खासगी डॉक्टर, पॅथेलॉजी लॅब यांच्याकडूनही संशयित रुग्णांची माहिती जमा करीत आहेत. त्या रुग्णांना ट्रॅक करून त्यांची तपासणी करण्यात येत आहेत, लक्षणे असणा-यांवर तातडीने उपचार करीत आहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही संशयितांची माहिती प्रशासनास द्यावी.
दिवाळीनंतर बाधीतांची संख्या घटली होती. मात्र आता नागरिकांची बेफीकिरी वाढली आहे. गर्दीत जाणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळले गेल्याने बाधीतांची संख्याही वाढत आहे. यापूढे बेफीकिरी खपवून घेतली जाणार नाही. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आज ४५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाभरात पथके तैनात करण्यात आली आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, मिरवणुका, हॉटेल, माॅल्स येथे नियमांचे पालन होण्यासाठी ही पथके लक्ष ठेवून आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत.

लग्नात एकावेळी फक्त ५० जणच हवेत

लग्न समारंभात होणा-या गर्दी मुळे अख्खे कुटूंब बाधित झाल्याचे निदर्शनास येत आहेत. तसेच मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे लग्न समारंभात एकावेळी केवळ पन्नास लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. तेथे नियमांचे पालन होते किंवा नाही हे तपासणीसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहे.

घाबरू नका समोर या…

कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्वरीत तपासणी करून घ्यावी. कोरोना झाला तर घाबरू नका. समोर या. लवकर उपचार केले तर निश्चितच बरे व्हाल. लक्षणे कमी असतील तर घरी आयसोलेशचा पर्याय उपलब्ध आहे.

कोरोनोशी लढण्याची आता दुसरी वेळ आहे. यापूर्वी आपण सर्वानी कोरोनाचा मुकाबला केला आहे. त्यामुळेच प्रादुर्भाव कमी झाला होता. आताही आपण सर्वांनी साथ द्या, नियमांचे पालन करा. अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही. असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

छावा मराठा युवा महासंघातर्फे शिवजयंती निमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Next Post

जिल्ह्यात आज 146 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात आज 146 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications