Thursday, October 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागरूक राहिल्यास मधुमेह ठेवता येईल दूर !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. रोहन केळकर यांची माहिती

२७ जून हा मधुमेह जागृती दिवस होय. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून आपला देश ओळखला जातो. त्यामुळे देशात खुप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार आढळत नाही. पूर्वीपेक्षा आता या आजाराविषयी बर्‍यापैकी जागरूकता निर्माण झाली असली तरी काही गोष्टी अश्या आहेत ज्या आज ही सामान्य लोकांना माहीत नाहीत. तर चला अशाच काही बाबी जाणून घेऊया या आजाराविषयी.

निदान


मधुमेहाच्या निदानात उपाशीपोटी (फास्टिंग) आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी (पीपी) अशी दोन वेळा साखरेची चाचणी केली जाते. यातील ‘फास्टिंग शुगर’ १२६च्या वर असेल आणि ‘पीपी शुगर’ २००च्या वर असेल तर त्या व्यक्तीस मधुमेह आसल्याचे शिक्कामोर्तब करता येते.


फास्टिंग शुगर’ ११० ते १२६ यामध्ये असेल तर त्याला ‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ असे म्हटले जाते, तर ‘पीपी शुगर’ १४० ते २००च्या मध्ये असेल तर त्याला ‘इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ म्हणतात.

‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ आणि ‘इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स’ असलेल्या व्यक्तींची रक्तातील साखर मधुमेहाच्या सीमारेषेवर आहे, असे म्हणता येईल. याला ‘प्री-डायबेटिक’ अर्थात मधुमेहापूर्वीची स्थिती असे म्हणतात.

लक्षणं

मधुमेह हा वेदनाविरहित आजार आहे. त्याची लक्षणे रुग्णाला चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. तहान-भूक अधिक लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, रात्री उठून लघवीस जावे तसेच रक्तातील साखर खूप वाढू लागली तर कितीही खाल्ले तरी वजन कमी होण्याची लक्षणे दिसू शकतात.

मधुमेहापूर्वीच्या स्थितीत घ्यायची काळजी


नियंत्रित आहार घेणे, रोज किमान अर्धा तास ‘एरोबिक’ प्रकारचा व्यायाम करणे (उदा. सायकल चालवणे, पोहणे, मध्यम गतीने पळणे, चालणे.), ताणतणाव आणि व्यसनांपासून दूर राहणे, दारूप्रमाणेच मांसाहार व धूम्रपानही टाळणे आवश्यक आहे.
रात्री वेळेवर व सलग सात तास झोप घेणे. दुपारी १५-२० मिनिटे विश्रांतीसाठी झोपणे चालू शकेल. दुपारी फार झोपणे आणि सततची बैठी जीवनशैली टाळायला हवी.
घरात इतर कुणाला मधुमेह असो वा नसो, पस्तिशीनंतर रक्तातील साखर तपासून पाहणे चांगले. मधुमेहाची आनुवंशिकता असल्यास अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.

मधुमेह झाल्यावर घ्यायची काळजी


योग्य पात्रता असलेला डॉक्टर निवडणे आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वत: च्या मनाने प्रयोग न करणे आवश्यक आहे.
गोळ्या घेतल्या म्हणजे मधुमेह फारसा वाढलेला नाही आणि इन्शुलिनचे इंजेक्शन घेतले म्हणजे आजार वाढला आहे, असे तर्क करणेही चुकीचे आहे. रुग्णाला गोळ्या द्यायच्या की इंजेक्शन हे डॉक्टरांना ठरवू द्या. मधुमेहात रक्तातील साखरेचे संतुलन बिघडते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी साखर, गूळ, मध, जॅम, जेली, चिक्की, आंब्यासारखी गोड फळे, चॉकलेट असे पदार्थ बंद करायला हवेतच, पण नुसती साखर बंद करून बाकी आहार कधीही व कसाही घेऊन चालत नाही. इतर पदार्थामधूनही साखर व ऊर्जा मिळते. (उदा. पोळी हीदेखील एक प्रकारे साखरच आहे.) आपल्या प्रकृतीप्रमाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डायट चार्ट तयार करणे व ते काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.


आहाराच्या वेळा पाळणे गरजेचे. घरातील इतरांचे जेवण झाले नाही म्हणून उशिरा जेवणे, मुळातच घरात उशिरा जेवण्याची सवय असणे, कार्यालयात जेवणाची सुट्टी उशिरा असल्यामुळे जेवणाच्या वेळेत चालढकल होऊ देणे हे मधुमेहींसाठी निश्चितच योग्य नाही. योग्य प्रमाणात व वेळेवर आहार घेतला तर ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची म्हणजे रक्तातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता कमी होते.
मधुमेही रुग्णांच्या पावलांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यासाठी पायाची काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना पादत्राणे घालून फिरावे.

डॉ. रोहन केळकर सहायक प्राध्यापक (औषधवैद्यकशास्त्र विभाग) शा. वै. म. जळगाव

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी “शावैम” सज्ज

Next Post

समाजातील औदार्याची गंगा सतत वाहती असावी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे समाजाला आवाहन

Next Post
समाजातील औदार्याची गंगा सतत वाहती असावी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे समाजाला आवाहन

समाजातील औदार्याची गंगा सतत वाहती असावी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे समाजाला आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

Private:

माहिती अधिकार सप्ताह निमित्त ९ ऑक्टोंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications