Thursday, October 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांशी संवेदनशिल राहून त्यांना न्याय देण्याचे काम करा – कृषी मंत्री दादाजी भुसे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांशी संवेदनशिल राहून त्यांना न्याय देण्याचे काम करा – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव(उमाका वृत्तसेवा)- संजय गांधी योजनेसह सर्व अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांशी प्रशासनासह संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सर्व सदस्यांनी संवेदनशिल राहून समन्वय साधत लाभार्थ्यांना न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.शासकीय विश्रामगृहातील सभागृहात राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे धनादेश मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यावेळी आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसिलदार किशोर मराठे, नायब तहसिलदार (संगायो) विकास पवार, बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे यांच्यासह संजय गांधी योजनेचे नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.

तालुकास्तरावरील संजय गांधी योजनेच्या नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, समितीच्या प्रत्‍येक सदस्याने तळागाळातील वंचित लाभार्थ्यांना शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. गाव निहाय व गट निहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार कराव्यात. संबंधित तलाठी व पात्र लाभार्थी यांच्यामध्ये समन्वय साधून तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सुचना मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.

या आढावा बैठकीला ज्या बँकेचे प्रतिनीधी अनुपस्थित होते त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्री श्री.भुसे म्हणाले, स्थानिक राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या शाखेत लाभार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. संगायो सारख्या अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी आपल्या बँकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करून लाभार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी. योजनेतील महिला लाभार्थ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी. या योजनेतील प्रत्येक लाभार्थी हा वयोवृध्द असल्यामुळे त्यांच्या विषयी संवेदनशिल राहून त्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या कामासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी बँकांसह तलाठ्यांनी प्राधान्यक्रम ठरविण्याचे आवाहन करतांना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम म्हणाले, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे अर्थसहाय्य विलंबाने प्राप्त होण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

यासाठी प्रत्येक गाव व गटनिहाय माहिती संकलीत करून होणारा विलंब ज्या तलाठ्यांमुळे अथवा ज्या बँकेमुळे होत असेल त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ नोटीस बजावण्यात यावी अशा सुचनाही अपर जिल्हाधिकारी श्री.निकम यांनी यावेळी दिल्या. तर गत दोन वर्षामध्ये मंजूर झालेल्या प्रकरणातील बरेच लाभार्थी हे मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत त्याची चौकशी करून आवश्यक त्रुटींची पूर्तता करून लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी मोहिम स्वरूपात कामकाज करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील तर सदस्य भगवान मालपुरे, महेंद्र साळुंखे, सुनिल पगार, गोरख शेवाळे, नाना निकम, दिपक तलवारे, आण्णा पवार यांना भावी वाटचालीस शुभेच्छा मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्यात. तर आभार तहसिलदार किशोर मराठे यांनी मानले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

Next Post

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

Private:

माहिती अधिकार सप्ताह निमित्त ९ ऑक्टोंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications