Thursday, March 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

न्यायालयाचा दणका;घरकुल घोटाळा प्रकरणी सर्वच दोषी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2019
in राजकारण, विशेष
Reading Time: 1 min read

गुलाबराव देवकर व सुरेश जैन यांच्यासह सर्व सहकारी दोषीचंं

जळगाव – राज्यभर गाजलेला जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवलेल्यांमध्ये माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वच आरोपींना दोषी ठरवलं आहे. सोबतच सर्व संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आज सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कोर्टात म्हंटले कि, घरकुल घोटाळ्यामुळे जळगाव महापालिकेवर कोट्यवधींचे कर्ज झाले आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून त्या जळगाव शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. निकालाच्या वेळी धुळे न्यायालयात मोठी गर्दी झाली. तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.

नेमके काय आहे प्रकरण?

जळगाव नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी घरकुल योजना राबवण्याचे ठरवले होते. घरकुल बांधण्यासाठी “हुडको” कडून कोट्यवधींचं कर्ज घेण्यात आलं होते. हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा याठिकाणी कर्ज काढून ११ हजार घरे बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार या सर्वांचा ससेमिरा मागे लागला. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खान्देश बिल्डर्सला हे काम दिलं. नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराला सुमारे २६ कोटी रुपये बिनव्याजी आगाऊ देण्यात आले. इतकेच नव्हे, तर ठेकेदारास विविध सुविधाही देण्यात आल्या होत्या. हा सगळा प्रकार २००१ मध्ये समोर आला होता.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे

Next Post

नोबल स्कूल मध्ये “एक दिवस आजी-आजोबांसाठी” अनोखा उपक्रम साजरा

Next Post
नोबल स्कूल मध्ये “एक दिवस आजी-आजोबांसाठी” अनोखा उपक्रम साजरा

नोबल स्कूल मध्ये "एक दिवस आजी-आजोबांसाठी" अनोखा उपक्रम साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d