एरंडोल-(शैलेश चौधरी)-येथून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील चोरटक्की गावानजीकच्या तलावाला २सप्टे. रोजी तडा पडल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून;या प्रकारामुळे चोरटक्की गावात घबराट पसरली आहे. यंदा नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे चोरटक्की तलाव ८०टक्के भरला आहे. या तलावाच्या माती बंधार्याला तडा गेल्यामुळे चोरटक्की ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली आहे.दरम्यान या तलावाला कोणताही धोका नाही असा दावा जिल्हा परीषद सिंचन विभागातर्फे करण्यात आला आहे .चोरटक्की येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी या प्रकरणी प्रांताधिकारी विनय गोसावी यांना भ्रमणध्वनी वरून सदर प्रकाराची माहीती दिली. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित विभागाला भेट देऊन पाहणी करण्याची सूचना दिली.त्यावरून ३सप्टे.२०१९ रोजी जिल्हा परीषदेचे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक,उपअभियंता एस. बी. गायकवाड,ज्युनियर इंजीनियर वाडेकर, अतीरीक्त सी.ई.ओ.गायकवाड,एरंडोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,मंडळ अधिकारी महाले यांनी ३सप्टे.२०१९ रोजी तलावास भेट देऊन पाहणी केली.तडा गेल्याच्या प्रकारामुळे तलावाच्या माती बांधाला कोणताही धोका होणार नाही असा अभिप्राय संबंधित अधिकारी यांनी दिला त्यामुळे तुर्तास चोरटक्की ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.