Thursday, October 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संविधान दिनी बरसल्या काव्यधारा!

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
संविधान दिनी बरसल्या काव्यधारा!

जळगांव(प्रतिनिधी)- संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे साजऱ्या झालेल्या कवीसंमेलनातून अनेक कवी कवयित्री आपल्या शब्दमाध्यमातून संविधानाची महती विषद केली.

बांनाई अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर नैशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअरच्या जळगाव शाखेने फुले, शाहू, आंबेडकर साहित्य मंच व समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदरचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावच्या साहित्य क्षेत्रातील मोठे नाव प्रसिद्ध कवी व लेखक व आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी श्री भगवान भटकर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण वाणी कार्यलय अधीक्षक समाजकल्याण जळगाव उपअभियंता व्ही के तायडे, सी. डी. तायडे तसेच बानाईचे अध्यक्ष आर. जे. सुरवाडे आदी विराजमान होते. प्रमुख अतिथींच्या अध्यक्षांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व सामुहिक संविधान प्रस्ताविकांचे वाचन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

ज्योती राणे यांनी आपल्या मधुर आवाजात गीत गायन करुन प्रमुख अतिथी व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. केवळ संविधानामुळेच सर्वसामान्यांचे अधिकार हक्क शाबूत आहेत संविधान नसते तर खूप अनर्थ काळा असता अश्या आशयाच्या कविता अनेक प्रसिद्ध कविंनी सादर केल्या यात कवी सुखदेव वाघ, सचिन मौर्य, संतोष साळवे, किशोर नेवे, गोपाळ बागुल, आर. डी. कोळी, अशोक पारधे, निंबा बडगूजर आदी कवींनी उत्तम कविता सादर केल्या तर प्रसिद्ध गायक कवी ईश्वर वाघ यांच्या भीमगीताने तसेच भीमराव सोनवणे यांच्या गेय कवितेने व कवी प्रकाश पाटील यांच्या गायलेल्या कव्वालीने कार्यक्रमाची रंगत वाढवली सुत्रसंचालनाची जबाबदारी प्रसिद्ध निवेदिका ज्योती राणे व गायक कवी ईश्वर वाघ या जोडीने बहरदारपणे पार पडली.

या प्रसंगी शितल शांताराम पाटील, ज्योती वाघ, ज्योती राणे, डाॅ सुषमा तायडे, पुष्पा साळवे, चित्रा भारत पगारे, गंगा सपकाळे, पाठक मॅडम या कवयित्रींनी तेवढ्याच ताकदीच्या व आशय व्यक्त करणारऱ्या कविता सादर केल्या अध्यक्ष कवी भगवान भटकर यांनी घटना तयार करतेवेळी बाबासाहेब यांना कीती यातना झाल्या तो माईसाहेबांच्या भटकरांनी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी प्रसंग श्रोत्यांसमोर उभा करताच श्रोत्यांनाही अभिमान वाटला चित्रा पगारे व बी. के. तायडे यांचा सत्कार करण्यात आला.

ज्योती वाघ यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमासाठी बानाईचे सुशांत मेढे, मनोहर तायडे, बी. के. तायडे, यु. जी. बोदडे, आर. जे. सुरवाडे, अजय निकम तसेच सुखदेव वाघ, ईश्वर वाघ, भिमराव सोनवणे, ज्योती वाघ, ज्योती राणे, चित्रा पगारे,शितल शांताराम पाटील, पाठक मॅडम, गंगा सपकाळे गाढोदेकर यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत -शालेय शिक्षणमंत्री

Next Post

‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही -मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post
राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही -मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

Private:

माहिती अधिकार सप्ताह निमित्त ९ ऑक्टोंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications