रावेर तालुक्यातील वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे पुर्ण दुर्लक्ष
अधिकारी वर्गाचा अखेर बेजबाबदार पणा
वन्य जीव धोक्यात, भूक तहान अभावी होत आहेत हिंसक
रावेर तालुका प्रतिनिधी दिपक तायडे
भयानक गर्मी मुळे रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगामधील जंगलातील वन्य प्राणी, जनावरं, वन्य जीव हे पर्यावरणाचे मित्र हालहाल आहेत. त्यामुळे हे प्राणी उपाशी व तहानलेले भटकत आहेत. हे प्राणी गावखेड्यापर्यंत अन्नाच्या व पाण्याच्या शोधात सरळ लोकवस्तीत शिरत आहेत. जंगलात देखील प्राणी पाण्याच्या शोधात हे वन्य जीव हायवे पर्यंत देखील येऊन पोहोचलेत. पण याकडे गेंड्याची कातडी धारण केलेले वनपाल व वनाधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.
या अधिकारी वर्गाने त्यांच्या कर्तव्यात कसूर हा सुरु केलेला आहे कारण काही माकडं हे गावाशहरात बिनदास्त येत आहेत काही हिंस्र प्राणी रात्री शेळ्या मेंढ्याचा फडश्या पाडताना च्या घटना घडत आहेत. यामुळे अगोदरच त्रस्त असलेला शेतकरी मजूर पूर्ण वैतागला आहे, एकीकडे शासन म्हणते शेतकऱ्याने आत्महत्या करण्या ऐवजी शेतीस जोड धंदा म्हणून पशुसंवर्धन पालन करावे आणि उदरनिर्वाह करावा परंतु इकडे परिस्थिती वेगळी आहे कारण वनपाल व वनाधिकारी यांच्या बेपर्वाई मुळे हिंस्र प्राणी या शेळ्या मेंढ्या खावून निघून जात आहेत अश्या वेळी झोपेचं सोंग घेतलेले वनाधिकारी वनपाल जागे होतील का?हा मोठा प्रश्न आहे.
रावेर तालुक्यातील अहिरवाडी क्षेत्र असो वा पाल वा अन्य या भागातील क्षेत्र, कोणताही वनपाल या भागातील वन्य प्राण्यांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे जनता देखील हिंस्र प्राण्यामुळे तणावात जीवन जगत आहेत, तरी हे सुस्त वनलाल या निंदनीय प्रकाराकडे आता तरी जातीने लक्ष देतील का?आणि मानव व वन्य जीव यांचा संघर्ष सोडवतील का आणि वन्य प्राणी मित्रांची भटकंती हाल थांबतील का नागरिकांना, शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल का असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.