Friday, July 18, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

येवला – एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ च्या रुंदीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
येवला – एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ च्या रुंदीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश !

जळगाव: गेली तीन-चार वर्षे येवला – एरंडोल राज्य महामार्ग क्र. २५ चे रुंदीकरण सुरू असून काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. रस्त्यालगत हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या महामार्गाच्या रुंदीकरणात गेल्या असून फळझाडांची देखील अवैध कत्तल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली होती.

शेतकऱ्यांनी महामार्ग रुंदीकरण करतेवेळी नवीन भूसंपादन कायदा, २०१३ अन्वये प्रक्रिया राबवून, रस्त्यालगतच्या रुंदीकरणात गेलेल्या शेतजमिनींची मोजणी करून मोबदला मिळण्यासाठी आवाज उठवला होता, सदर प्रकरणात कित्येकदा पत्र व्यवहार व तक्रारी करून देखील शेतकऱ्यांकडे कानाडोळा करत बळजबरीने शेतजमिनींचा ताबा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने मे. साचो सतराम बिल्डकॉन ह्या चाळीसगाव येथील कंत्राटदार कंपनी मार्फत रस्त्याचे रुंदीकरण तसेच झाडांची कत्तल तडीस नेली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. सदरच्या रस्त्याची जुनी रुंदी ही ३.५ मीटर ते ५.५ मीटर इतकी असून रुंदीकरणादरम्यान ही रुंदी ३० मीटर इतकी झाली आहे व आजतागायत अतिरिक्त आवश्यक असलेल्या जमिनी संदर्भात भूसंपादन प्रक्रिया राबवली गेली नाही. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी, जळगाव यांनी कार्यकारी अभियंता, जळगाव यांच्या समवेत सदरच्या शेतजमिनींची मोजणी करून प्रक्रिया सुरू करण्याचे मौखिक आश्वासन दिले होते परंतु तशी प्रक्रिया आजतागायत सुरू झाली नाही. हजारो शेतकरी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीपासून वंचित होऊन आज अल्पभूधारक बनले असून त्यापैकी काही शेतकऱ्यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी दि. २९ एप्रिल २०२२ रोजी न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहारे यांच्या न्यायपीठासमोर पार पडली. याचिककर्त्यांच्या वतीने ॲड. भूषण महाजन यांनी भूसंपादन प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची मोजणी करून त्यायोगे मोबदला देण्याच्या प्रमुख प्रार्थना मा. उच्च न्यायालयासमोर ठेवल्या आहेत.

गुढे येथील माधवराव पंडित पाटील आणि इतर १८ शेतकरी वि. महाराष्ट्र शासन, आडगाव येथील चंद्रशेखर अजित वाघ आणि इतर १३ शेतकरी वि. महाराष्ट्र शासन, सेवानगर येथील पुंडलिक सोमला राठोड आणि इतर १५ शेतकरी वि. महाराष्ट्र शासन अशा एकूण ४९ शेतकऱ्यांच्या रिट याचिकेत मा. उच्च न्यायालयाने प्रधान सचिव सा.बां.वि., कार्यकारी अभियंता सा.बां.वि. जळगाव सहित इतर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत १० जून २०२२ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून एक प्रत याचिकर्त्याना सोपविण्याचे निर्देश दिले आहेत. याचिककर्त्या शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. भूषण महाजन यांनी मा. उच्च न्यायालयात कामकाज पाहिले असून पुढील सुनावणी २० जून २०२२ रोजी ठेवण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मासुच्या कमिटीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडुन बैठकीचे आमंत्रण-जिल्हाध्यक्ष रोहन महाजन

Next Post

पिंप्राळा – हुडकोत 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न….!

Next Post
पिंप्राळा – हुडकोत 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न….!

पिंप्राळा - हुडकोत 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत वितरण व बांधकाम कामगार नोंदणी मार्गदर्शन शिबिर संपन्न….!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications