Thursday, October 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या उच्चकृषी तंत्रज्ञानाने राजस्थानचे शेतकरी समृद्ध करणार – राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)- संपूर्ण देशात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यात राजस्थानमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला पिण्याचे शुद्ध पाणी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध रहावे, यासाठी आताच सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचदृष्टीने जैन इरिगेशनने निर्माण केलेल्या पाणी निम्म्यानं, उत्पादन दुप्पटीने देणारे ठिबक, स्प्रिंकलर्सचे उच्च कृषि तंत्रज्ञान राजस्थानमधील शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेऊन त्याचा प्रचार-प्रसार करावा, यासाठी राजस्थान सरकार जैन इरिगेशनसोबत असेल; असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.

जैन इरिगेशनचे कृषिविषयक हायटेक तंत्रज्ञान समजुन घेण्यासाठी आले असता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत बोलत होते. त्यांच्यासोबत राजस्थानचे कृषिमंत्री लालचंद कटारिया, खाण व गोपालन मंत्री प्रमोद भाया, आमदार रोहीत बोहरा, मुख्य सचिव कुलदिप रांका उपस्थित होते. यावेळी त्यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फुडूसचे संचालक अथांग जैन उपस्थित होते.

पाण्याची टंचाई पाहता शेतीला पाट पद्धतीने पाणी न देता ते ठिबक, स्प्रिंकलर्स अशा अत्याधुनिक सिंचन तंत्राद्वारे द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राजस्थानमधील शेतकरी हा बदल आत्मसात करील अशी अपेक्षाही व्यक्त केली. राजस्थान देशातील सर्वात मोठे राज्य आहे. मोठे क्षेत्रफळ आहे. शेतीवर मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. परंतु पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे. भविष्यात पाण्याची तीव्रता अधिक जाणवेल. त्यामुळे ठिबकचे महत्त्व राजस्थाने समजले आहे. येणाऱ्या पिढीसाठी ठिबकचा राजस्थानमध्ये प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न करणार आहे. पाण्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग व्हावा आणि शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी आताच शेतकऱ्यांनी आवश्यक पावले उचली पाहिजे. ठिबक सिंचनासह आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तसेच राजस्थानमधील प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी जैन इरिगेशनच्या सहकार्याने यापुढेही नवनवीन संकल्पना राबवून राजस्थान समृद्ध करणाचे सुतोवाच त्यांनी केले. यासाठी जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. पाण्यावर महत्त्वाचे कार्य करणाऱ्या इस्त्राइलमध्येसुद्धा जैन इरिगेशन कार्य करीत आहे. तेथील त्यांचे पाणी आणि शेतीविषयक कार्य मी जवळून पाहिले आहे. इस्त्राइल येथील हे तंत्रज्ञान भारतात जैन इरिगेशनने आणले याचा अभिमान असल्याचेही मुख्यमंत्री अशोक गहलोत यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड्स लि. च्या मसाले प्रकल्पासही भेट दिली. या प्रकल्पासाठी काही कच्चा माल हा राजस्थान येथून येत असल्याने या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रकल्पासाठी राजस्थानच्या शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे सुतोवाच केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगांव शहर विकासाच्या आखाड्यात राज्यकर्त्याची संकल्प सूत्र धूळ खात

Next Post

गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक- अशोक गहलोत

Next Post

गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक- अशोक गहलोत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

Private:

माहिती अधिकार सप्ताह निमित्त ९ ऑक्टोंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications