Sunday, December 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालमृत्यू नियंत्रणासाठी जलसंजीवनी आवश्यक – डॉ. बेंडाळे

जागतिक ओआरएस दिनानिमीत्त सप्ताहाचे आयोजन उत्साहात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
बालमृत्यू नियंत्रणासाठी जलसंजीवनी आवश्यक – डॉ. बेंडाळे

जळगाव – बालमृत्यू होण्याची साधारणपणे पाच कारणे आहेत. त्यातील अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे डिहायड्रेशन अर्थात अतिसार. अतिसारामुळे बालके दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणायचे असेल तर ओआरएस म्हणजेच जलसंजीवनीचा वापर अधिक करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांनी व्यक्त केले.

 

जागतिक ओआरएस दिनानिमीत्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या बालरोग विभागातर्फे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. बेंडाळे म्हणाले की, लहान मुलांना अतिसार होणे, अति ताप येणे यामुळे सर्वाधिक बालमृत्यू होतात. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर, लघवी कमी होणे, अश्रु कमी होणे, जीभ कोरडी पडणे, त्वचेला चिमटी घेतल्यास ती त्वरीत पुर्ववत न होणे अशी अतिसाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे गंभीर असल्याने त्यावर उपचार करणे आवश्यक असते. ओआरएस अर्थात जलसंजीवनी हे साखर, मीठ व पाणी हे प्रमाणात टप्प्याटप्प्याने घेतल्यास अतिसार कमी होतो.

 

जागतिक आरोग्य संघटनेने देखिल ओआरएस वापरासंबंधी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यानुसार ओआरएसचा अधिकाधिक वापर केल्यास अतिसाराची समस्या दूर होते. तसेच बालकाची रोगप्रतिकारक शक्ती देखिल वाढण्यास मदत होते. जागतिक ओआरएस दिन साजरा करतांना ओआरएसचे महत्व जाणून घेऊन त्याचा वापर केल्यास बालमृत्यू सहज कमी होतील असा विश्‍वास डॉ. अनंत बेंडाळे यांनी व्यक्त केला. बालरोग तज्ञ डॉ. रोहीणी देशमुख यांनी आभार मानले.
ओआरएसमुळे 50 टक्के आजार आटोक्यात- डॉ. अणेकर
बालरोग तज्ञ डॉ. अणेकर यांनी मार्गदर्शन करतांना ओआरएसचे महत्व पटवून सांगितले. ओआरएसच्या वापरामुळे लहान मुलांमधील 50 टक्के आजार आटोक्यात आणता येतात. तसेच बालकाला कुठल्याही सलाईनची गरज पडत नाही. आपल्या देशात दुर्गम भागात याबाबत जनजागृती अधिक गरजेची असल्याचे हॉ. अणेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी केले ओआरएसबाबत सादरीकरण
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील आदित्य महाजन, ऋषीकेश मडके, आदित्य काळे, महिमा गुल्हाणे, गुंजन जैन या विद्यार्थ्यांनी ओआरएसचे महत्व आणि वापरासंबंधीचे प्रात्याक्षिक कार्यक्रमात सादर केले. यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. रोहिणी देशमुख, डॉ. दर्शन राठी, डॉ. कुशल धांडे, डॉ. चंदाराणी देगूलरकर, डॉ. ओमश्री गुडे, भारती झोपे यांच्यासह विद्यार्थी व माता उपस्थित होत्या.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

योगासना स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विवेक सूर्यवंशी याला सिल्वर मॅडेल

Next Post

श्रीराम विद्यालयात विद्यार्थ्यांना २ हजार वह्यांचे वाटप

Next Post
श्रीराम विद्यालयात विद्यार्थ्यांना २ हजार वह्यांचे वाटप

श्रीराम विद्यालयात विद्यार्थ्यांना २ हजार वह्यांचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d