Friday, July 11, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ओल्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या पाल्यांची शैक्षणिक फी माफ करावी यासंदर्भात दर्जी फाऊंडेशनचे बहिणाबाई चौधरी “उ.म.वि” ला निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/11/2019
in विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्रात सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे. यामध्ये शेतकरी हा पुर्णतः ढासळला गेला असून यामुळे बळीराजाला विविध स्तरांतून उभारी देण्याची नितांत गरज आहे. अस्मानी संकटामुळे आपल्या पाल्यांचे शिक्षण कसे करावे हि मोठी समस्या बळीराजासमोर भिंत बनून उभी आहे. बळीराजाला शासन स्तरावरून मदत मिळेल परंतु कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकत असलेली मुलं ही बहुतांश ग्रामीण भागातील असून शेतकर्‍यांचे पाल्य आहे. तरी विद्यापीठाने या विद्यार्थांची २०१९-२० या शैक्षणीक वर्षाची फि माफ केली तर या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाल्यांचे पुढील शिक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल. सन २०१९-२० ची शैक्षणिक फी माफ केल्यामुळे शेतकर्‍यांची मुले शैक्षणिक प्रवाहात टिकतील. मुंबई विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे तर पुणे विद्यापीठातही या संदर्भात निर्णय प्रक्रिया सुरु असून आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची सन २०१९-२० शैक्षणीक फी माफ करावी, असे दर्जी फाऊंडेशन च्या वतीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु यांना यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी कुलगुरु पी.पी. पाटील यांच्यासह राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन सदस्य दिलीप रामू पाटील, दर्जी फाऊंडेशचे संचालक गोपाल दर्जी पाटील, प्रविण पाटील, दिनेश पाटील, तुषार तायडे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

ओला दुष्काळ आणि सरकार स्थापनेत मदतीची अपेक्षा

Next Post

खा.उन्मेश पाटील महापौर ना. सीमाताई भोळे यांच्या उपस्थितीत खड्डे डागडुजीचा शुभारंभ

Next Post

खा.उन्मेश पाटील महापौर ना. सीमाताई भोळे यांच्या उपस्थितीत खड्डे डागडुजीचा शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications