Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेमार्फत संविधान साक्षर ग्रामचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव.07, संविधान साक्षर ग्राम अभियानांतर्गत 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर 2019 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील 02 गावांना दत्तक घेवून त्या गावांमध्ये संविधानाविषयी जनजागृती करून गावातील प्रत्येक  व्यक्तीला संविधान विषयक माहिती करून देवून ते गाव 100 टक्के संविधान साक्षर गाव करण्याचा कार्यक्रम  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संथेमार्फत आयोजित केला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे   या संस्थेमार्फत  आयोजित   संविधान साक्षर ग्रामच्या  नियोजनासाठी  जिल्ह्यातील पातारखेडे ता.एरंडोल व खेडी बु.ता.जळगाव ही 2 गावे दत्तक घेतली असून दत्तक गावांमध्ये संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी  संथेने  पाताखेडेसाठी  1) अर्जुन गायकवाड 2) शांतराम हटकर 3) महेंद्र मराठे 4) नीतीन भोई 5) स्नेहा बोरसे 6) जयश्री चौधरी 7) शेखअक्रम मुजावर यांची तर खेडी बु.साठी 1) चंद्रकांत इंगळे 2) शिल्पा मालपुरे 3) सरला गाढे 4) युसुस तडवी 5) कल्पना बेलसरे  6) अर्चना किरोते 7) सविता चिमकर यांची  समतादूत  म्हणून नियुक्त केले आहे. संविधान साक्षर ग्राम  अभियानाच्या प्रथम बैठकीत  गावाची निवड करून गावाची पाहणी करणे,गावाचा सूक्ष्म आराखडा तयार करणे ,गावाचा नकाशा (सुक्ष्म) तयार करून त्याअनुषंगाने सरपंच ,पोलीस पाटील,आशावकर्स,अंगणवाडीसेविका आणि गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांच्या समन्वयातून  गावकऱ्यांची बैठक लावणे व गावकरऱ्यांना भारतीय राज्यघटनेचे महत्व,अंमलबजावणी व कायदेविषयक प्राथमिक स्वरूपातील माहिती देण्यात येईल. संविधान साक्षर ग्राम अभियानाच्या दुसऱ्या बैठकीत गटविकास अधिकारी, तससिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, प्रांताधिकारी, गटशिक्षाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, उप विभागीय पोलीस अधिकारी आणि गावातील  शासकीय  सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी  यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. सदर बैठकांचा उद्देश 100 टक्के संविधान साक्षरतेची गरज,प्रचार व प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा तयार करणे असा आहे. गावपातळीवरील बैठकांमधून  महाविद्यालयीन युवक- युवती  तसेच बचत गटातील महिला, शेतकरी गट, गावातील युवक वर्ग यांच्या विशेष बैठका लावून त्यांच्या समन्वयातून 100 टक्के संविधान साक्षरतेची संकल्पना विषद करणे  असा आहे. संविधानाचा प्रचार व प्रसार चांगल्याप्रकारे व्हावा यासाठी महिलांचा सहभाग घेवून  विशेष कार्यशाळेतून व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व, बेटी बचाव बेटी पढाओ साक्षरता इ.  विषयांवर प्रबोधपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय संविधान आणि मुलभुत अधिकार या विषयातील तज्ञ आणि विविध  विभागातील शासकीय अधिकारी  घरा-घरांपर्यंत पोहचून भारतीय राज्य घटनेचे प्रास्ताविक  भिंतीवर लावतील.तसेच शाळांमधून संविधानाचे नियमित वाचन घेणे, कोनशिला तयार करणे, पत्रकार परिषदा घेणे, वेगवेगळया प्रसार माध्यमांद्वारे प्रचार व प्रसार करणे ,विविध  मान्यवर ,विचारवंत, अभ्यसक लेखक, यांच्या गावभेटींचे आयोजन करून संविधानाचे महत्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम या  अभियांतर्गत केले जाणार असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे संस्थेचे महासंचालक श्री. कैलास कणसे,मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे तसेच  बार्टीच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी  श्रीमती भाग्यश्री अर्जुन पाईकराव यांनी एका संयुक्त पत्रकान्वये केले आहे.   

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ईद ए मिलाद सणानिमीत्त भडगाव येथे शांतता कमिटीची बैठक उत्सांहात संपन्नशहरात शांतता राखण्याचे आवाहन

Next Post

धाडसी क्रीडा प्रकारीतील तज्ञांनी 14 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावे

Next Post

धाडसी क्रीडा प्रकारीतील तज्ञांनी 14 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications