Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तालुक्यातील अनेक ग्रामपचांयतींकडे दिव्यांग निधी पडून

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

सरपंच, ग्रामसेवकांकडून निधी खर्चाबाबत उदासिनता
दिव्यांग बांधवांची उडविली जातेय खिल्ली

जळगाव-(विषेश प्रतिनिधी)-तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत दिव्यांग निधी येवून पडला आहे. मात्र अद्याप पावेतो सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उदासिनतेमुळे हा निधी दिव्यांग बांधवांवर खर्च केला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासन दरबारी आल्या असून याची दखलदेखील अद्याप शासनाकडून घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान दिव्यांग व्यक्तीला सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगता यावे, त्याची प्रगती व्हावी, यासाठी शासन प्रत्येक गावासाठी अपंग निधी देत असतो. मात्र तालुक्यातील असे काही गावं आहेत की ते हा निधी गावात दिव्यांग व्यक्ती असल्यावरदेखील खर्च करत नाही. काही गावातील सरंपच आणि ग्रामसेवकांनी तर चक्क हा निधी इतरत्र खर्च केल्याचा प्रकार देखील मागील काळात समोर आला आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने हा निधी दिव्यांग बांधवांसाठी योग्य काळात त्यांच्या जीवनमान उंचविण्याकरिता खर्च करावा अशा आशयाचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शासन दरबारी पत्रव्यवहार देखील केलेला आहे. असे असतांना याची दखल का घेतली जात नाही. असा प्रश्न आता सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे. शासनस्तरावरुनच जर दिव्यांग व्यक्तींची फरपट होत असेल तर त्यांना भक्कम बनवून त्यांचे जीवनमान उंचवणे या शासनाच्या मुख्य हेतूला डाग लागल्याशिवाय राहणार नाही.

बीडीओ याप्रकाराकडे लक्ष देतील का?

तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींनी अपंग निधी खर्च केला नाही. अशा ग्रामपंचायतींवर गटविकास अधिकारी काय कारवाई करणार असा सवाल आता दिव्यांग बांधव विचारु लागले आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना याकडे जातीनं लक्ष घालावेच लागेल तर दिव्यांग बांधवांना न्याय मिळेल व ते सामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगू शकतील.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पत्रकार देवरे यांना शिविगाळ केल्या प्रकरणी मारवड पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

आंधळी पंचायत समिती कागदपत्रं न तपासता वाटतेय घरकुल

Next Post

आंधळी पंचायत समिती कागदपत्रं न तपासता वाटतेय घरकुल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications