काल रात्री मी एक स्वप्न बघितल. मला पूर्णपणे काही आता आठवत नाही पण, मी काहीतरी बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करत होते. काहीतरी स्ट्राँग धडपड करत होते मी . रात्रभर मी शांतपणे झोपू शकले नाही स्वप्नात काहीतरी धडपड करता करताच मला सकाळी अचानक जाग अली. डोळे उघडले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला, की अरे, हे स्वप्न होते ?
म्हणजे ही धडपड व्यर्थ होतीी. स्वप्न म्हणजे त्याचे आता जाग आल्यावर तर काही अस्तत्वच नव्हते. पण त्याच वेळी मनात असा विचार चमकून गेला की, ” हे जीवन सुद्धा असेच तर आहे,संत महंत सांगुन गेले की जीवन एक स्वप्न आहे.ते खरेच तर आहे जेव्हा मृत्यु जवळ येते (होते) तेव्हा कळते आजवर जे काही प्रपंचाच्या उठाठेवी केल्या, त्यामूळे हव तर मन:स्ताप सुध्दा सहन केला. आणि आपण आता शेवटी काय सोबत नेणार इतक सुंदर स्वप्नरुपी जीवन देवाने दीले त्यात आपण स्वत: ला आणि इतरांना कधी सुखी केल का?
आणि सुख म्हणजे तरी नेमक काय ? काय हव होत आल्याला , आणि आता सुध्दा आपल्या आत काय हव आहे ? का आहे ही आस? कसली हुरहुर….?
– शितल शांताराम पाटील, शेळगाव, जि.जळगाव 9325533279