Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आश्रय फाऊंडेशनने घेतली फैजपूर शहरातील सुमारे ६० लोकांच्या रोजच्या जेवणाची जबाबदारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विरोदा(प्रतिनिधी)- करोना संक्रमण थांबवण्यासाठी शासनाने संपूर्ण लाॅकडाऊन केलेले असल्याने शहरात असलेल्या गरीब, निराधार, निराश्रीत व दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या जनतेचे अन्नाअभावी हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर फैजपूर प्रांत डाॅ.अजित थोरबोले यांनी डाॅ.भरत महाजन यांना केलेल्या आवाहनानुसार यावल व रावेर तालुक्यातील डाॅक्टरांच्या आश्रय फाऊंडेशनने फैजपूर शहरातील सुमारे ६० लोकांच्या रोजच्या जेवणाची जबाबदारी गेल्या तीन दिवसांपासून घेतली आहे. पंधरा दिवसांसाठी ही अन्नदान सेवा सकाळ संध्याकाळ अविरतपणे चालू राहील असे फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.कुंदन फेगडे, नगरसेवक यावल नगरपरिषद यांनी सांगितले. या लोकांनी अन्नासाठी शहरात विनाकारण फिरु नये व एकाच ठिकाणी राहून शासनाच्या लाॅकडाऊनचे त्यांच्याकडूनही पालन व्हावे हा व्यापक हेतू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आज सकाळी डाॅ.कुंदन फेगडे, डाॅ.पराग पाटील, डाॅ.विलास पाटील, डाॅ.प्रशांत जावळे यांनी या गरजूंकडे प्रत्यक्ष जाऊन जेवणाचे वाटप केले. यावेळी फाऊंडेशनच्या डाॅक्टरांनी यावेळी या सर्व लोकांना रोज जेवण मिळेल म्हणून आश्वस्त केले. फाऊंडेशच्या या उदात्त कामात रोज कल्पेश खत्री, पप्पू जाधव, उमेश वायकोळे, कन्हैय्या चौधरी, पंकज जयकर, मनिष माहूरकर, आशिष गुजराथी यांचे मोलाचे सहकार्य व सक्रिय सहभाग आहे. या उदात्त कामात कुणाला अथवा कुठल्या स्वयंसेवी संस्थेला स्वेच्छेने एका दिवसासाठी अन्नदान करायचे असल्यास किंवा अजून नवीन निराधारांची जबाबदारी घ्यायची असल्यास एक दिवस आधी डाॅ.भरत महाजन 9822838188 किंवा कल्पेश खत्री 9371846888 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बिळात?

Next Post

महाराष्ट्रातील पत्रकारांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे -वसंतराव मुंडे

Next Post

महाराष्ट्रातील पत्रकारांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे -वसंतराव मुंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo