Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

????????????????????????????????????

अमरावती : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरु करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व आवश्यक संसाधनांचा उपयोग करुन शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण परिषदेच्या सूचनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले जाईल व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

Maha Info Corona Website

जिल्हा नियोजन भवन येथे राज्यमंत्री श्री.कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणजीत पाटील, महानगरपालिकेचे शिक्षण सभापती गोपाळभाऊ धर्माळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, सहायक शिक्षण संचालक तेजराव काळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलीमा टाके, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह शासकीय, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी शाळांचे संचालक व विविध शिक्षण संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री.कडू म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर झालेला आहे. या संकटकाळात विद्यार्थ्यांना बाधा होऊ नये म्हणून सद्य:स्थितीत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. या विषाणूने हजारो किलोमीटरचा टप्पा पार करुन देशात प्रवेश केला आहे. देशातून राज्यात व राज्यातून शहरात तसेच शहरातून गावात याचा शिरकाव झाला आहे. विषाणू प्रतिबंधासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. आरोग्य यंत्रणा रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. परंतू, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. जून महिन्यात शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक सत्रे सुरु होतात. परंतू कोरोना विषाणूचा संक्रमितांचा आकडा वाढू नये यासंदर्भात दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते.

ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शहराच्या ठिकाणी शक्य आहे. परंतू ग्रामीण भागात शेतकरी, मजूर वर्गाच्या पाल्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान व स्मार्ट फोन आदींची अडचण आहे. त्यामुळे शैक्षणिक विषमताही निर्माण होता कामा नये. त्यामुळे शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी सर्व शाळा सुरु करण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा कशा सुरु करता येईल, कोविड आजाराबाबत सर्व प्रतिबंध, दक्षतेचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, यासाठी शिक्षण विभागाद्वारे धोरणात्मक निर्णय घेऊन प्रयत्न करण्यात येईल. 

विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ. शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला आहे. या प्रारुप आराखड्याच्या अनुषंगाने शिक्षण परिषदेत प्राप्त झालेल्या सूचनांचा उपयोग नक्कीच होईल. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना अवगत करण्यात येईल, असेही श्री. कडू यांनी सांगितले.

परिषदेत कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे स्वरुप व कार्यपद्धती याविषयी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ शासकीय व खासगी शाळांचे व्यवस्थापन, विविध शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांच्याकडून प्राप्त सूचनांचा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे स्वरुप व कार्यपद्धतीच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय होण्यासाठी उपयोग होईल, असे श्री. कडू यांनी सांगितले.

शिक्षण परिषदेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संघटनेसह इतर विविध शिक्षण संघटनेच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून राज्यमंत्र्यांनी त्यांची मते जाणून घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘एक वृक्ष माझ्या अंगणात’ नेहरू युवा केंद्र जळगावचा अभिनव उपक्रम

Next Post

जिल्ह्यात 50 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जिल्ह्यात 50 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात 50 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo