Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ;नागरिकांना पायी चालणे झाले कठीण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ;नागरिकांना पायी चालणे झाले कठीण

जळगांव-(चेतन निंबोळकर)- शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत होऊन चिंता व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, महापालिकेचा हलगर्जीपणा, श्वानप्रेमी यामुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला जळगांवकरांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडूनही पालिकेकडून फारशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. गल्लोगल्ली टोळ्याटोळ्यांनी फिरणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या या कुत्र्यांच्या समस्येबद्दल नागरिकांनी तक्रार करूनही वेळीच प्रशासनाने दखल न घेतल्याने या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा शहरात वावर वाढलाय. रस्तोरस्ती व गल्लोगल्लीत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, नागरिकांवर धावून जाणे, रस्त्यावरच जोरजोरात भुंकणे यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्यांची दहशत पसरली आहे. कुत्र्यांची वाढलेली संख्या ही केवळ डोकेदुखीच नाही तर भयावह वाटणारी बाब ठरू लागली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना शहरात घडलेल्या आहेत. अस्वच्छ परिसरात कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होते.कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रस्त्यावर कुठेही टाकण्यात येणार कचरा, त्यातील पदार्थ, मासांचे तुकडे, हाडे यांच्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य उपलब्ध होत असल्याने शहर परिसरात कुठेही कुत्रे नजरेस पडत असतात. शहरात रस्त्यावर होणारी मांस विक्री, हॉस्टेल, हॉटेल आणि घरगुती शिळ्या अन्नपदार्थांची नागरिक व व्यावसायिक आजूबाजूच्या परिसरात विल्हेवाट लावतात. त्यामुळे कुत्र्यांनादेखील अन्नाच्या शोधात भटकंती करावी लागत नाही.शहरातील सर्व परिसराचा विचार केल्यास मोकाट कुत्र्यांची संख्या हजाराच्यावर भरेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.शहरातील बहुतांशी भागात नॉनव्हेज खाद्यपदार्थ मिळणारी हॉटेल्स आहेत. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उघड्यावर होणारी मांसाची विक्री आणि काही हॉटेलच्या आजूबाजूची अस्वच्छता यांच्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. महापालिकेने अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे अधिकाऱ्यांना सांगूनही त्यावर उपाययोजना केल्या नाहीत असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुले, वयोवृध्द नागरिकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे.
सकाळी ६ ते १० आणि रात्रीच्या वेळी या मोकाट कुत्र्यांचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात म.गांधी जयंती निमित्त नई ‘तालीम सप्ताह’

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस चे असंघटित कामगार महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सुरेन्द्र मोरे यांनी घेतला उमेदवारी अर्ज

Next Post
राष्ट्रवादी कॉंग्रेस चे असंघटित कामगार महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सुरेन्द्र मोरे यांनी घेतला उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी कॉंग्रेस चे असंघटित कामगार महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सुरेन्द्र मोरे यांनी घेतला उमेदवारी अर्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo