Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

२५ वर्षे आमचीचं सत्ता,मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

महाराष्ट्र – राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे.

या यात्रेतील पाथर्डी येथील सभेत बोलताना फडणवीस यांनी ‘आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या. मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण पुढील २५ वर्षे आम्हीच सत्तेवर राहाणार आहोत. १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन् मुजोरीही पाहिली. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. ईव्हीएममुळे हरलो असा आरोप ते करतात. मात्र ईव्हीएममुळे नव्हे तर त्यांना जनतेने हरविले असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी ‘विरोधी पक्षांची अवस्था बुद्धू पोरांसारखी झाली आहे. अभ्यास करायचा नाही आणि नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून कारणे द्यायची. सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली आणि ते ईव्हीएमला दोष देतात असं विधान केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या सभेला जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. त्यात बबनराव पाचपुते, दिलीप गांधी, मोनिका राजळे, राम शिंदे हे नेते उपस्थित होते. त्यामुळे या नेत्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून जिल्हा निरोगी बनवूया -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

राम राहीमला दणका;हायकोर्टाने फेटाळला पॅरोल

Next Post

राम राहीमला दणका;हायकोर्टाने फेटाळला पॅरोल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo