Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमृत महोत्सवातील महाराष्ट्र हा “हरित महाराष्ट्र” करण्यासाठी राज्यशासनाने धोरण आखणे गरजेचे -गिरीश पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अमृत महोत्सवातील महाराष्ट्र हा “हरित महाराष्ट्र” करण्यासाठी राज्यशासनाने धोरण आखणे गरजेचे -गिरीश पाटील

जळगांव(प्रतिनीधी)- आज आपण महाराष्ट्राचे हिरक महोत्सव साजरे करीत आहोत! आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! गेल्या साठ वर्षात राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच अनेक क्षेत्रात आपण आदर्शवत कामगिरी केली आहे. मात्र साठीतला महाराष्ट्र जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा पर्यावरण क्षेत्रात कुठतरी मागे पडतोय असे दृष्टीक्षेपात येते!

सध्या कोरोनाच्या थैमानात पर्यावरणाचे महत्व जेव्हा आपल्याला कळतय, तेव्हा ह्या बाबी आपल्यासमोर येण गरजेच आहे, अस मला वाटत! केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मते, देशातील १०० अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रांच्या यादीत महाराष्ट्रातील ९ क्षेत्रांचा समावेश होतो, जे कि तारापूर, चंद्रपूर,औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबूर, पिंपरी व महाड हि आहेत. आपल्याकडच्या सुमारे ७५००० कारखान्यांपैकी १२,५०० कारखाने अति प्रमाणात प्रदूषण करणारे आहेत.देशात वायूच्या मानकांबाबत अतिप्रदूषित ९४ शहरांमध्ये जळगावचा देखील समावेश आहे. एकूण महाराष्ट्रातील २० शहरे त्या यादीत आहेत. महाराष्ट्रातील ४९ नद्या ह्या अति गलिच्छ असल्याचे केंद्रीय प्रदूषण मंडळाचे निरीक्षण आहे. याच प्रमुख कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रक्रियेविना कारखान्यातील व शहरातील सांडपाणी नदीत सोडण्यात येते.आकडेवारीत पहायचे झाल्यास नाशिकमध्ये दररोज ३० लाख लिटर सांडपाणी गोदावरीत, कोल्हापुरात २ कोटी लिटर पाणी पंचगंगेत, अहमदनगरात सहा कोटी लिटर पाणी सीना नदीत तर आपल्या जीवाच्या मुंबईमध्ये १५० कोटी लिटर पाणी, नव्हे नव्हे घाणच समुद्राला अर्पण केली जात आहे.या दुषित पाण्यावर जी शेती केली जात आहे,त्या पिकांमुळे कॅन्सर सारखे दुर्धर रोग नागरिकांना होत आहे. जळगाव जिल्ह्याट जळगाव शहरातील पाणी थेट गिरणा नदीत सोडले जाते, शिवाय माझ्या निरीक्षणानुसार जिल्ह्यात कोठेही सांडपाणी प्रक्रिया केले जात नाही, ते थेट नदीत सोडले जातात. चोपड्यातील रत्नावती नदीचे गटारगंगेत झालेले रुपांतर आपण जाणतोच.येत्या काही वर्षात इतर नद्यांचीही तीच परिस्थिती निर्माण होणार आहे.अवैध वाळूउपसा झाल्याने घटणारी भूजलपातळी हा चिंतेचा विषय आहे. हवामान बदल ह्या संकटाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे, शेतकरी आत्महत्या हा देखील त्याचाच परिणाम! राज्यात हवामानबदल समायोजन विभात कार्यान्वित करत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे! आज साठीतल्या महाराष्ट्रातील युवकांच्या वतीने मी राज्य शासनास आवाहन करतो आहे कि महाराष्ट्राला हरित महाराष्ट्र बनवण्यासाठी सरकारने धोरण आखावे, त्याची काटेकोरपणे अमलबजावणी करावी, आम्ही सर्व युवक ह्याला जनचळवळीत रुपांतर करण्यासाठी मेहनत घेऊ व जेव्हा महाराष्ट्र आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असेल तेव्हा आपला महाराष्ट्र हा हरित महाराष्ट्र झालेला असेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कळंब तालुक्यातील एकूरका येथे मनसे कडून गरजूंना जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या वस्तूंची मदत

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
65 वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo