Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनचे दुसऱ्या तिमाहीचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई-(प्रतिनिधी) – भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2019-20च्या दुसऱ्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेले एकल व एकत्रित निकाल मुंबई येथे 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जाहीर केले.

दुसऱ्या तिमाहीची ठळक वैशिष्ट्ये

एकत्रित उत्पन्न 1388.3 कोटी रुपये आणि कर, व्याज आणि घसारापूर्व नफा 80.4 कोटी रुपये नोंदला गेला. एकल उत्पन्न 395.8 कोटी आणि कर, व्याज आणि घसारापूर्व नफा हा 1 कोटी रूपये झाला. विदेशातील व्यवसाय स्थिर आहे. भारतातील व्यवसायासकठीण रोखीची तरलता परिस्थिती आणि यावेळचा खूप लांबलेला पावसाळा अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. बँकांसोबत कर्ज निराकरणाचे काम सध्या सुरु आहे.

कर्जाचा टक्का कमी करण्याचे उपाय – अनिल जैन

या आर्थिक निकालाबाबत बोलतांना जैन इरिगेशन सिस्टीमस लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले, “या वर्षाची दुसरी तिमाही कंपनीसाठी खूप आव्हानात्मक ठरली. कंपनी या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. अनेक उपाय योजत आहे. पहिल्यांदा कंपनी येणेकऱ्यांकडून पैसे वसूली व विक्रेते यांचे नियोजन करीत आहे. दुसऱ्या उपायात कंपनी भारतीय कंपनी कायद्यानुसार बँकांबरोबर व्यवहार करत आहे. तिसरे म्हणजे कंपनीच्या कर्जांचा ताळेबंदातील टक्का कमी करणे हा उपाय कंपनी करत आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत विदेशातील व्यवसायात स्थिरता आहे आणि त्यात एकूण 10 टक्के वाढ झालेली दिसते आहे.”

कंपनी खूप कठीण परिस्थितीत आहे पण कंपनीकडे यातून मार्ग काढण्यासाठी संसाधने उपलब्ध आहेत. कंपनी त्यांचा योग्य वापर करून लवकरच या परिस्थितीतून बाहेर येईल. कंपनीच्या व्यवसायाचा खूप चांगला इतिहास आहे. तसेच कंपनी ताळेबंद सुधारण्यासाठी विविध उपाय वापरत आहे आणि त्याच वेळी चांगल्या (ऑर्डरींच्या) मागण्यांची पूर्ततेची अंमलबजावणी करीत आहे. कंपनी कमी खेळते भांडवल लागणाऱ्या व्यवसायात वाढ करीत आहे. कंपनीच्या उत्पादनांची मागणी ही भारत सरकारने घेतलेल्या कृषी, जल, सिंचन, रस्ते, नैसर्गिक वायु, अन्नप्रक्रिया या क्षेत्रातील विविध सुधारणांमुळे वाढतच आहे. कंपनीच्या भागधारकांचा कंपनीला पाठिंबा कायम आहे आणि कंपनी त्यांना धन्यवाद देते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिजामाता विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती सप्ताहाचे उद्घाटन

Next Post

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo