Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!

जळगाव-(प्रतिनिधी) – जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या रस्ता राहिला नसून तो अधिकृत ‘कचरा डेपो’ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुना जकात नका जळगाव शहराच्या हद्दीत असणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरून नेहमी मोठी वर्दळ असतानाही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

मेहरुण तलावामुळे शिरसोली रस्ता निसर्गरम्य परिसर बनला. या रस्त्याचे सिमेंट क्रॉक्रीटीकरण झाले आहे. या रस्त्यावर अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि जैन हिल्ससारखी महत्वाच्या संस्था आहेत. तसेच मंगल कार्यालयसुद्धा आहे. जैन हिल्सवर नेहमी असंख्य शेतकरी व इतर मान्यवरांची वर्दळ असते. पाचोरा, चाळीसगावसह नाशिक-पुणे शहराकडे जाण्यासाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या काही भागात सामाजिक संघटनांनी वृक्षरोपण केले आहे. परंतु रस्त्यांच्या बाजूला टाकलेल्या कचऱ्यामुळे सुंदर रस्ता भकास होत आहे. जोरदार हवेमुळे उडून अनेकवेळा कचरा उडून रस्त्यावर येतो. तसेच वाहन धारकांच्या डोळ्यातही जातो. त्यामुळे अपघातही होत असतात.

प्रशासनाचे मौन?

या रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. ‘स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव’च्या घोषणा देणारे प्रशासन शिरसोली रस्त्याच्या या विद्रुपीकरणावर गप्प का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दंडात्मक कारवाईची भीती नसल्यामुळेच कचरा टाकणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

रस्त्याच्या कडेला साचलेल्या या कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच भयानक होण्याची शक्यता आहे. रस्ता सुंदर करण्याऐवजी तो भकास करणाऱ्या या प्रवृत्तींना चाप लावणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन

Next Post
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo