Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही-सुषमा खराडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in राष्ट्रीय, लैंगिक शिक्षण, विशेष
Reading Time: 2 mins read
लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही-सुषमा खराडे

काही महिन्यांपूर्वी एका केसमध्ये परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयाच्या संदर्भात ‘परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच म्हणणं योग्यच आहे’ असा पोल प्रकाशित केला होता.

जाहिरात

परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधाना लग्नाचं खोटं वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं योग्यच आहे.

सहमत (80%, 793 Votes)
असहमत (12%, 124 Votes)
सांगता येत नाही (8%, 80 Votes)
Total Voters: 997

या केसविषयी व्यवस्थितपणे जाणून घेतले तर लक्षात येते की कोर्टासमोर ज्या बाजू आलेल्या आहेत त्यामध्ये महिलेला सर्व परिस्थितीची पूर्व कल्पना होती व परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवलेले आहेत असे उघड होते. त्यामुळे अशा संबंधांना फसवणूक किंवा लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं आहे. अशा स्थितीसंदर्भात विचार केला तर कोर्टाचा हा निर्णय बऱ्याच जणांना योग्य वाटला. कारण विशिष्ट स्थितीमुळे एखाद्याला दोषी ठरवण चुकीचं आहे.

विशिष्ट हेतू – दबाव – फसवणूक – दोषारोप

ही जरी एक बाजू असली ज्याठिकाणी पुरुषावर चुकीचे आरोप लावले जाऊ शकतात किंवा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन फसवणूक केली जाऊ शकते. परंतु अशा घटनांचे प्रमाण तरी किती आहे आपल्याला माहित आहेच. पण दुसरी बाजू घेतली तर लक्षात येतं की लैंगिक शोषणाच्या, अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना घडतात यामध्ये महिलांवर होणाऱ्या हिंसेचं प्रमाण हे प्रचंड आहे. अमिष दाखवून, धमकी देऊन, फसवणूक करून महिलेच्या आर्थिक, भावनिक, शारीरिक असहाय्यतेचा गैरफायदा घेणारे पुरुष समाजात आहेत. कधीकधी पुरुषही एखाद्या फसवणुकीला बळी पडू शकतात. त्यामुळे स्त्रिया अशाच असतात किंवा पुरुष तसेच असतात असा दोषारोप न करता पिडीत व्यक्तीला न्याय मिळवून देणं हे महत्वाचं असतं.

नातं कोणतही असो पण एकमेकांना कोणत्याही गोष्टीसाठी गृहीत धरणं हे चुकीचंच आहे. शारीरिक संबंधांमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींची या कृतीसाठी परस्पर संमती असणं महत्वाचं आहे. काही काळ एकमेकांसोबत राहून परस्पर सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या विशिष्ट हेतू पूर्ततेसाठी समोरील व्यक्तीवर दबाव आणणं किंवा आपली फसवणूक झाली असं म्हणणं हे चुकीचं आहे.

जबाबदारी कुणाची?

बहुतेक वेळा अशा नात्यामध्ये जोडपी ज्याप्रकारे मानसिक/भावनिकरित्या जोडलेली असतात त्याचीच पुढची पायरी ही शारीरिक संबंधांकडे जाण्याची दाट शक्यता असते. जर मनाने आपण जवळ असू व शारीरिक ओढ दोघांनाही जाणवत असेल तर सुरक्षित शारीरिक संबंध आल्यास त्यात वावगं काय आहे? पण हे शारीरिक संबंध त्या वेळची गरज म्हणुन पाहणार की भविष्याचा विचार करुन केलेली तरतुद असणार? अशा लैंगिक संबंधांना जर हो किंवा नाही अशी द्विधा मन:स्थितीत असल्यास त्याबाबत नेमके व स्पष्टपणे याबाबत एकमेकांशी बोलायला हवं की नको? अन महत्वाचे म्हणजे नात्यामध्ये जे घडेल त्याची जबाबदारी दोघेही घेणार की नाही?

अठरा वर्षाखाली बालकांसाठी कायदा काय सांगतो.

संमती शिवाय शारीरिक संबंध ठेवणं हा कायद्यानं गुन्हा मानला जातो. शरीर संबंधांमध्ये परस्पर सहमती जरी महत्वाची असली तरी, यातील एखादी व्यक्ती अल्पवयीन (अठरा वर्षाखालील) असेल तर त्या व्यक्तीची संमती ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असे कायदा सांगतो.

‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महामार्ग पोलिस पाळधी यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानास सुरवात

Next Post

आदर्श विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Next Post

आदर्श विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d