Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित – माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित – माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

मुंबई, दि. 1 : स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित असल्याचे मत माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंडिया ग्राऊंड रिपोर्ट (आयजीआर) प्रकाशनाच्या माध्यमातून दै. दो बजे दोपहर या वृत्तपत्राचे पुन:प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार महादेव जानकर, माजी आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, दै. दो बजे दोपहर चे संपादक अरुण लाल, सह संपादक राजा अदाते उपस्थित होते.

राज्यमंत्री मंडळातील तरुण महिला सदस्य तसेच पालकमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानपत्र देऊन राज्यमंत्री कु. तटकरे यांना सन्मानित करण्यात आले.

राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना नियमित वृत्तपत्र वाचनाची चांगली सवय जडली. पत्रकारितेच्या कार्यकक्षा बदलत असताना प्रिंट मिडीया प्रमाणेच सोशल मीडिया, ई-न्यूज या माध्यमातून राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडमोडींची माहिती दिवसभरात स्मार्टफोनच्या माध्यमातून पहायला मिळते. तरीही माझ्यासारख्या अनेकांना सकाळच्या चहासोबत वृत्तपत्र हाती असावे, असे नेहमी वाटते. वृत्तपत्रासाठी चिकाटीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे सर्व उपलब्ध होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या माध्यमातून होणाऱ्या जबाबदारीपूर्ण लिखाणातून आम्ही बऱ्याच नवीन गोष्टी शिकत असतो, असेही दै. दो बजे दोपहर या वृत्तपत्रास शुभेच्छा देताना राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या.

राजकारणाचा वारसा लाभला असला तरी विधिमंडळाची पहिली पायरी चढताना एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या पद, कर्तव्य व जबाबदारीची भावना अधिक प्रकर्षाने जाणवते. क्षेत्र कोणतेही असो आपल्या कर्तव्याची जबाबदारी, चिकाटी व यासारख्या सन्मानपूर्ण प्रोत्साहान सोहळ्यातून मिळणारी ऊर्जा मोठी भरारी घेण्यासाठी उपयुक्त ठरते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याची भावना मंत्री कु. तटकरे यांनी बोलून दाखवली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

३ जून जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने चला, एक दिवस सायकल चालवूया

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo