Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
रब्बी हंगामातील पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव(जिमाका)- कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्ह्यातील हतनूर मोठा प्रकल्पा वरील जलाशय, हतनूर कालवा कं.मी 0 ते 92 पर्यंत व तापी नदी, सुकी, अभोरा, अग्नावती, तोंडापूर, हिवरा, मोर, मंगरुळ व बहुळा या मध्यम प्रकल्पावरील तसेच गाळण, बदरखा, गारखेडा, सार्वखाजोळा, बाबंरुड, वाकडी, लोहारा, गहुला, पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे, सातगाव, सार्वपिंप्री, कळमसरा, गोदेंगाव, चिलगांव, पिंपळगाव, वाकोद, बिलवाडी, गोडखेल-1, शेवगा, मोहाडी, माळपिंप्री, पिंप्री, गोद्री, हिवरखेडा, वेल्हाळे या लघु प्रकल्पावरील कालव्याच्या वितरिकेवर प्रवाही, जलाशय नदी नाले व कालव्यावर उपसा सिंचनाने पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभधारकांना कळविण्यात येते की,

यावर्षी सन 2021-22 मध्ये रब्बी हंगामात सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यानुसार दिनांक 15 ऑक्टोबर, 2021 ते 28 फेबुवारी, 2022 या मुदतीकरीता रब्बी हंगामातील गहु, दादर, हरबरा, अन्यधान्य, चाऱ्याची पिके या पिकांसाठी अटींचे अधीन राहून सिंचनास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. तरी आपले पाणी अर्ज नमुना क्रमांक 7 वर मागणी भरुन दिनांक 31 डिसेंबर, 2021 पर्यंत आपल्या भागातील शाखाधिकारी यांचे शाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष जमा करावेत, यानंतर पाणी अर्जाची मुदत वाढविली जाणार नाही.

रब्बी हंगाम 2021-22 मध्ये नविन उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्यानुसारच पाणी अर्ज मंजुरीचा विचार केला जाईल. रब्बी हंगाम 2020-2021 पर्यंत थकबाकी पुर्ण भरावी, थकबाकीदारांना मंजूरी दिली जाणार नाही, शेतकऱ्यांनी आपआपली शेतचारी दुरुस्त करुन स्वच्छ ठेवावी, मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत व सलग असावे, मागणी क्षेत्रात पाटमोट सबंध नसावा, मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जावर सव्वापट आकारणी करण्यात येईल, प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजुरी मिळाली असे समजण्यात येवू नये, मंजुर क्षेत्रास व मंजुर पिकांनाच पाणी घ्यावे लागेल, काही अपरीहार्य कारणाने मंजुर पिकासाठी पाणी पुरवठा न करता आल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही व नुकसान भरपाई दिली जाणार नाही.

पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा अथवा खाते पुस्तिका संबंधीत पाट शाखेत दाखवावी लागेल, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत 31 डिसेंबर, 2021 नंतर वाढविली जाणार नाही, उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अधिक उत्पन्न घ्यावे, मंजुरी ही पाटबंधारे अधिनियम महाराष्ट्र राज्य 1976 व प्रचलित शासन नियमांच्या तरतुदीच्या अधिन राहील, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रास मंजुरी दिली जाईल. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पालकमंत्री उद्या जिल्हा दौऱ्यावर

Next Post

विरोधी पक्ष नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा -महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी

Next Post
विरोधी पक्ष नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा -महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी

विरोधी पक्ष नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा -महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d