Wednesday, March 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव’ पुरस्कृत ‘साहित्य पुरस्कार-2019’साठी प्रतिभावंत साहित्यिकांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव’ पुरस्कृत ‘साहित्य पुरस्कार-2019’साठी प्रतिभावंत साहित्यिकांची निवड

मेघना पेठे यांना बहिणाई, अजय कांडर यांना बालकवी ठोमरे तर रफिक सूरज यांना ना. धों. महानोर पुरस्कार जाहीर

जळगाव-(प्रतिनिधी)- मराठी साहित्य क्षेत्रात मानाचे पान ठरलेल्या बहिणाबाई पुरस्कार, बालकवी ठोमरे पुरस्कार आणि ना. धों. महानोर ह्या पुरस्कारांसाठी प्रतिथयश साहित्यिक, कवींची निवड आज करण्यात आली. ‘भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 9 सदस्यीय समितीने जैन हिल्स येथे झालेल्या बैठकीत ही निवड केली.

या बैठकीस विशेष आमंत्रित म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,  पद्मश्री ना. धों. महानोर, तसेच निवड समिती सदस्य राजन गवस, डॉ. दिलीप धोंडगे, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, शंभू पाटील हे सदस्य उपस्थित होते. 2018-19 या द्विवार्षिक पुरस्कारासाठी श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि. सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी , जि. कोल्हापूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. जळगावचे कल्याणकारी अंग असलेल्या भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे बहिणाई पुरस्कार, भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. काव्य, कथा, कादंबरी नाटक,  गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी,  साहित्यिक,  समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. आतापर्यंत या पुरस्काराचे स्वरूप 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप होते परंतु 2019 पासून या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात येऊन ती एक लाख रुपये अशी करण्यात आली आहे.

साहित्य क्षेत्रातील योगदानाचा सुयोग्य सन्मान – डॉ. भालचंद्र नेमाडे

समाजातील विविध विषयांचा सखोल अभ्यास आणि सूक्ष्म निरीक्षणातून दृष्टीपथास आलेल्या वास्तवाचे दर्शन लेखक आपल्या लेखणीतून समाजाला घडवीत असतात. साहित्यकलेच्या माध्यमातून समाजहित जोपासणार्‍या सारस्वतांचे ऋण फिटणे तसे अशक्यच, परंतु तरीही समाजहितपयोगी वाङ्मयाची समाजाकडून दखल घेणे गरजेचे वाटते. साहित्यक्षेत्राला अधिकाधिक प्रेरणा, बळकटी व व्याप्त स्वरुप प्राप्त व्हावे त्यांना प्रोत्साहान मिळावे यासाठी भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन व बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे या साहित्य पुरस्काराचे प्रयोजन आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाचा हा सुयोग्य सन्मान असल्याचे  डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी सांगितले. या पुरस्कार निवड समितीमध्ये प्रथितयश लेखक, प्राध्यापक यांचा समावेश आहे. लेखकाचे लेखन क्षेत्रातील कर्तृत्व, सृजनशीलता, आलेल्या शिफारसी, निवड समितीची पारदर्शकता या कसोट्यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. साहित्य क्षेत्रात आपले वेगळे वैशिष्ट्य या पुरस्कारांनी जपले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्व.कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना जाहीर

Next Post

सभापती पुरस्कृत आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

Next Post
सभापती पुरस्कृत आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

सभापती पुरस्कृत आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d