Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदींचा त्यात समावेश आहे. या योजनांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज भरण्यास 28 फेब्रुवारी, 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.


सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाईन भरावेत. महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर पुन्हा शासनाकडून कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सदरील बाब विद्यार्थ्यांचे निदर्शनास आणूस द्यावी. तसेच याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये आपले स्तरावरुन विविध माध्यमाद्वारे जनजागृती करावी. दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहील. महाडीबीटी प्रणालीवर पात्र अनूसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांना कृषी विभागाचे आवाहन

Next Post

जीडीसीए परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाइनच स्वीकारणार

Next Post

जीडीसीए परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाइनच स्वीकारणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo