Thursday, July 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्याकरीता आपली पेंशन आपल्या दारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16-    विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य या योजना राबविल्या जातात दिव्यांग, वयोवृध्द, अनाथ बालके, दुर्धर आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्याना त्यांचे बँक खात्यात दरमहा अर्थसहाय वितरीत करण्यात येते (राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य एकरकमी अर्थसहाय्य) अशावेळी दिव्यांग, वयोवृध्द दुर्धर आजारी व्यक्ती व इतर लाभार्थ्याना बँकेत जावुन त्यांचे अर्थसहाय्य आवश्यकतेनुसार काढावे लागते दरवेळी या लाभार्थ्याना बँकेत जाणे शक्य होईलच असे नाही. तसेच त्यांचे घरापासून बँकेचे अंतर, बँकेतील गर्दी या अशा कारणांमुळे अर्थसहाय्य काढतांना लाभार्थ्याचे श्रम, वेळ व पैसा खर्च होतो व त्यांना कष्ट पडतात. अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट खात्यामार्फत राबविण्यात येणारी “आपली पेंशन आपल्या दारी” योजना लाभार्थ्याना अधिक मदतकारी ठरु शकते. यात लाभार्थ्याचे बँक खात्यात जमा असलेले अर्थसहाय्य इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे कर्मचारी / प्रतिनिधी लाभार्थ्याचे घरी जावुन आधार क्रमांक पडताळणी आधारीत प्रक्रियेने  Adhar enabled payment system- (Aeps) लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अदा करु शकतात.

या इंडिया पोस्ट बॅकेचे कर्मचारी हँड हेल्ड डिवाईस वर लाभार्थ्याचे आधार पडताळणीकरीता अंगठा/ बोंटाचा ठसा घेतील व लभार्थ्याचे आधार पडताळणीनंतर त्यांचे बँकेतील जमा रक्कमेतुन लाभार्थ्याने मागणी केल्याप्रमाणे अनुदान त्यास अदा करतील, यात आधार पडताळणी होवू न शकल्यास अशा लाभार्थ्याना निवृत्तीवेतन घरपोच अदा करता येणार नाही. अशा लाभार्थ्यानी त्यांचे बँकेत जावुन आपले निवृत्तीवेतन काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याकरीता लाभार्थ्याकडून कुठलीही फी किंवा शुल्क इंडिया पोस्ट बॅकेच्या कर्मचाऱ्यांकडून आकारण्यात येणार नाही. सदर योजना विनामुल्य व ऐच्छिक स्वरुपाची आहे. यांत लाभार्थ्याचा आधार व मोबाईल क्रमांक त्यांचे बॅक खातेशी संलग्न  (link) असणे गरजेचे आहे. सध्या ही योजना राष्ट्रीयकृत बॅकांसाठी लागु राहील यांत कुठलेही बॅक खाते लाभार्थ्याना बदलण्याची गरज नाही. लाभार्थ्याच्या योजनेचे मुळ बॅक खाते तेच राहील. यांत लाभार्थ्यीस त्यांच्य बॅक खात्यात जमा असलेल्या रक्कमेतुन रक्कम रु. 10,000/- मर्यादेपर्यत रक्कम काढता येतील.

          जळगाव जिल्हयात 1 जुलै, 2022 पासुन विशेष सहाय्य योजनेच्या 100% लाथार्थ्यांना “आपली पेंशन आपल्या दारी” या योजने अंतर्गत अर्थसहाय्य घरपोच वाटप करावयाचे आहे. या करीता गावनिहाय विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची याबाबत तलाठी व इंडिया पोस्ट बॅकेच्या अधिकारी / कर्मचारी यांनी गावात बैठक घ्यावी. व लाभार्थ्याना सदर योजना समजावुन सांगावी तसेच या प्रक्रियेचा  Demo दयावा असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व तहसिलदार व संगायो शाखेतील अधिकारी / कर्मचारी यांना दुरचित्रवाणी परिषदेव्दारे दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यातील उमेदवारांची नांव नोंदणी झाली सुरू;नाव नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2021-22

Next Post

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2021-22

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications