जळगाव-(धर्मेश पालवे)-खा.ओवेसी आणि खा.इम्तियाज जलील यांच्या प्रमाणेच दलित मुस्लिम व आदिवासी यांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी भरीव कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त करत रावेर विधानसभा क्षेत्रात प्रस्थापित सरकारने शेतकरी,कष्टकरी,मजूर आणि केळी पिकाच्या तोंडाला एन दुष्काळात पाने पुसले आहेत.त्याच बरोबर केळी उत्पादन,केळी कामगार,शेतमजूर यांच्या उत्थानासाठी रावेर यावल तालुका पॅटर्न राबविण्याची योजना मनात असून तडवी ,पावरा या आदिवासी जमातीसाठीच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणून निधी वाढवण्याच्या मुद्यावर भर दिला देईल.मुसलमान समुदायासाठी आवश्यक असलेल्या सच्चर आयोगाच्या शिफारशी व मुस्लिम आरक्षण शासन अमलात आणत शैक्षणिक व समाजीक स्थरावर मुस्लिम समाजाची प्रगती मंदावली आहे,त्यासाठी धनगर समाजाला आरक्षण लागू न करता ज्या प्रमाणे सवलती राज्य सरकारने लागू केल्या त्या प्रमाणे मुस्लिम समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत काही टक्के सवलती जाहीर कराव्यात या साठी कार्य करणार असल्यासाची गवाही मा ठाकरे यांनी दिली आहे. शैक्षणिक ,सामाजिक आणि राजकीय हक्काची सुरक्षणात्मक जबादारी स्वीकारून समाजाचे सर्वपरीने भले करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मजलीस पार्टी मुस्लिम समाजाची पार्टी असल्याचे समजले जाते, मात्र मी राज्यात संख्येने अत्यल्प असलेल्या धोबी समाजाचा माणूस मजलीस पार्टीचे अध्यक्ष खा.बेरिस्टर असोद्दीन ओवेसी यांच्या संसदेतील कामाने प्रभावित होऊन या पक्षाकडे आकर्षित झालो असल्याचं स्पष्ट करत ,रावेर -यावल तालुक्यातील उपेक्षितांच्या साठी भरीव काम करण्याची आकांशा आहे असे ही मा विवेक ठाकरे यांनी सांगितले. ज्या समाजाचे हे प्रस्थापित सरकार प्रतिनिधित्व करत आहे त्या समाजाचे ही भले हे सरकार करू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे, मजलीस पार्टीने संधी दिल्यास या संधीचे सोने करून दाखवीन असा विश्वास या पार्टीचे रावेर मतदार संघातील दावेदार मा विवेक ठाकरे यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.