Tuesday, July 8, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कांताई बंधारा ठरतोय मुख्यजल ”स्त्रोत”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
कांताई बंधारा ठरतोय मुख्यजल ”स्त्रोत”

जळगाव-(प्रतिनिधी) – गिरणा धरण व बहुळा-दहिगाव प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी कांताई बंधारा ओसंडून वाहतो आहे, यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.
पाणी म्हणजे ‘जीवन’. जीवनमान उंचाविण्याचे माध्यम. पाण्याचे शाश्वत स्त्रोत ग्रामीणस्तरावर निर्माण व्हावे, यासाठी श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीने कांताई बंधाऱ्याची निर्मिती झाली. सुमारे पाच किलोमीटर परिघातील गावांमधील हजारो लोकांचा जीवनस्तर उंचावण्याचे प्रभावी माध्यम कांताई बंधारा ठरत आहे. विहिरी, बोअरवेल यांना पाझर फुटून भूजलस्तर वाढला आहे. शेत-शिवार फुलले आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन गावांमधील स्थलांतर थांबण्याबरोबरच या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी कांताई बंधारा मुख्य जलस्त्रोत ठरत आहे.
पाणी टंचाईचे संभाव्य धोके टाळण्यासाठी नद्यांवर जागोजागी बंधारे बांधून पाणी अडविण्याशिवाय पर्याय नाही हे मोठ्याभाऊंनी जाणले. जळगावला लागूनच गिरणा नदी वाहते, मात्र नियोजनच्या अभावामुळे या परिसरात आधी पाण्याचे दुर्भिक्ष होते. पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावेत; यासाठी जळगाव तालुक्यातील धानोरा आणि कढोली परिसरात बंधारा बांधण्याचे डॉ. भवरलालजी जैन यांनी निश्चित केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. च्या आर्थिक सहयोगाने तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत यासंदर्भात शासनाशी करार करण्यात आला. झालेल्या करारानुसार  परिसरातील अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. जीवनदायी गिरणा नदी
कांताई बंधारा हा गिरणा धरणापासून १४० किलोमीटर अंतरावर आहे. यादरम्यान सहा बंधारे आहेत. गिरणेला हिरवा, बहुळा, चितुर या मुख्य उपनद्यांसह लहान-मोठे नाल्यांमधून पाण्याची आवाक होत असते. समाधानकारक पावसामुळे सध्या गिरणा धरणातून २ हजार ५०० क्यूसेस तर बहुळा-दहिगाव प्रकल्पातून ११ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे कांताई बंधारा ओसंडून वाहत आहे. गिरणा नदीला आलेल्या पाण्यामुळे परिसरातील हजारो शेतकरी सुखावले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळांमुळे बळिराजा खचला होता. जीवनदायी असलेली नदी वाहत असल्याने त्याला नवी उमेद आली आहे.
हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली
कांताई बंधारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून अवघ्या ९ महिने ११ दिवसात पूर्ण झाला आहे. १८० कोटी लिटर क्षमता असून पाच किलोमीटर बॅकवॉटर आहे.  दापोरा, दापोरी, खेडी, धानोरा, कढोली, वैजनाथ, नागझिरी, मोहाडी, टाकरखेडा, सावखेडा, बांभोरी, निमखेडी, आव्हाणा या गावांना बंधाऱ्याचा प्रत्यक्ष फायदा होत आहे. यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. शेकडो विहिरी बोअरवेलांचे भूजलस्तर उंचावले आहेत. यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
दळणवळणासह आर्थिकस्तर उंचावला
पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरी नगदी पिके घेऊ लागले आहेत. वर्षाला तीनदा पीक घेता येत आहे. केळी, कांदा, भाजीपाला, कापूस या बागायत पिकांकडे शेतकरी वळले आहेत. यामुळे आर्थिक चलन-वलन होऊन त्यांचा आर्थिकस्तर उंचावला आहे. तसेच कांताई बंधाऱ्याजवळ जोडरस्ता तयार करून दिला आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांना दळणवळणाची सुविधा निर्माण झाल्याने मुख्य बाजारपेठांपर्यंत त्यांना लवकर पोहचता येत आहे, याचा फायदा विद्यार्थ्यांसह, प्रवाशांनाही होत आहे.
बंधाऱ्याची ठळक वैशिष्ट्ये
जळगाव तालुक्यातील धानोरा आणि कढोली परिसरातील गिरणा नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची पाणी क्षमता १७९.१८ कोटी असून याचे पाणलोट क्षेत्र ९१३.६१ चौरस किमी. एवढे आहे. या बंधाऱ्याची लांबी गिरणेच्या पात्राप्रमाणे २४६ मीटर एवढी असून त्याची जास्तीत जास्त उंची ८.९२ मीटर एवढी आहे. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असताना याचे बॅकवॉटर सुमारे ५.६६० मीटर पर्यंत जाते. बंधाऱ्याच्या भिंतींची उंची साडेचार मीटर असून ८१ दरवाजे ठेवण्यात आले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

धरणगांव येथे तंबाखू मुक्त कार्यशाळा उत्साहात संपन्न;४ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

Next Post

विधानसभा निवडणूक कामकाजासाठी एरंडोल तहसिल कार्यालयात एक खिडकी सुविधा केंद्राची स्थापना

Next Post

विधानसभा निवडणूक कामकाजासाठी एरंडोल तहसिल कार्यालयात एक खिडकी सुविधा केंद्राची स्थापना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications