समाजात फार पूर्वी “स्त्रीसत्ताक” पद्धत होती असे इतिहास सांगतो. पण कालांतराने काही अनिष्ठ रूढी परंपरा व मानवता लुप्त होत गेली आणि “पुरुषसत्ताक” पद्धतीचा जन्म झाला. याचा वाईट असा परिणाम समाजावर काही झालेला नाही पण “स्त्री” चे स्थान दुय्यम झाले. आणि यामुळे महिलांचा संबंध फक्त चूल आणि मुलं एवढाच इतिहास जमा झाला होता. परंतु म्हणतात ना बदल हा निसर्गाचा नियम आहे. तसेच झाले. सावित्रीमाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या जोडीला काम करून महिलांसाठी पहिली शाळा सुरु केली याची इतिहासात नोंद आहे. कालांतराने महिला शिक्षणाच्या प्रवाहात आल्यात आणि तिथूनच त्यांचा सुखकर प्रवास सुरु झाला. पण आजही आपल्याला महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार ऐकण्यास येत असतात. कित्येक दिवस तर काही महिला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत वाच्यताच करीत नाही. तसेच बऱ्याच महिलांनी आपले स्वतःचे असे एक वलय निर्माण केले आहे. २१ व्या शतकात तर असे एक हि क्षेत्र नाही कि त्यात महिलांनी आपले विशेष स्थान निर्माण केलेले नाही. आम्ही या सर्व बाबींचा विचार करूनच आपल्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या प्रत्येक कार्याला समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
आम्ही अन्याला वाचा फोडण्यासाठी सत्यमेव जयते या नावाने न्युज पोर्टल चालवीत आहोत, वाचकांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळेच आम्हाला हि प्रेरणा मिळाली. तसेच महिलांच्या कार्याला योग्य न्याय मिळावा ह्या प्रांजळ हेतूने आम्ही “स्त्री शक्ती” हे आपल्या हक्काचे व्यासपीठ निर्माण करीत आहोत.
स्त्री शक्ती च्या माध्यमातून आम्ही आपल्या कार्याच्या माहितीला प्रसिद्धी देणार आहोत.
महिलांच्या प्रगतीसाठी एक छोटासा प्रयत्न करीत आहोत.