जळगाव -(प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर स्वच्छ भारत अभियान २.० ची अंमलबजावणी शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट असून या अंतर्गत शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्रोक्त व्यवस्थापन व शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे समाविष्ट आहे.
या योजनेअंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा केलेला असून त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मा.प्रधान सचिव (नवि-२), नगरविकास विभाग यांच्या यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या २६ मार्च २०२५ रोजीच्या बैठकीस दिलेल्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून नगरविकास विभाग शासन निर्णय क्र.स्वमअ-२०२३/CN१०६०११२(३)/नवि-३४ दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलेला आहे. या प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब, मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा.जलसंपदा मंत्री श्री.गिरीशभाऊ महाजन, मा.पालकमंत्री श्री.गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानलेले आहेत.